दापोलीतल्या सभेत रामदास कदमांचा पूर्ण रोख होता, तो आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर. मला संपवण्याचा एककलमी कृती कार्यक्रमच मातोश्रीवर हाती घेण्यात आला होता, असं म्हणताना रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंच्या विधानावर बोट ठेवलं. त्यावर बोलताना रामदास कदमांनी जे विधान केलंय, त्याची आता जोरात चर्चा सुरूये. यावेळी रामदास कदमांनी रश्मी ठाकरेंवरही टीका केली.
ADVERTISEMENT
फडणवीस सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री राहिलेल्या रामदास कदम यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये स्थानच मिळालं नाही. इतकंच काय, तर नंतर विधान परिषदेत पुन्हा उमेदवारीही देण्यात आली नाही. त्यानंतर रामदास कदम मातोश्री आणि शिवसेनेच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचं दिसून आलं.
तब्बल दोन अडीच वर्षांपासून मौन बाळगलेल्या रामदास कदमांनी आता थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरच टीकेची उठवलीये. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर रामदास कदमांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर आता दापोलीतल्या सभेत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर रामदास कदमांनी हल्लाबोलच चढवला.
मुख्यमंत्री व्हावं म्हणून उद्धव ठाकरेंवर रश्मी ठाकरे ओरडल्या?; रामदास कदमांनी काय म्हटलंय?
रामदास कदम नक्की काय म्हणाले होते?
आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला प्रत्युत्तर म्हणून आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात रामदास कदमांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. ‘मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही, असं कधी कुणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?’, रामदास कदम उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले.
Ramdas Kadam : ‘अरे आदित्य खरा गद्दार तू आहेस, काका म्हणून पाठीत खंजीर खुपसला’
उद्धव ठाकरेंबरोबरच रामदास कदमांनी रश्मी ठाकरेंवरही उपहासात्मक टीका केली. कदम म्हणाले, ‘आमच्या रश्मी वहिनी मंत्रिमंडळात कशा आल्या नाही? याचं आश्चर्य वाटतंय. कुठेही गेले की त्या सोबत हव्यातच. माँसाहेब कधी कोणत्या कार्यक्रमात गेल्या नाही. व्यासपीठावर चढल्या नाही’, असं रामदास कदम रश्मी ठाकरेंबद्दल बोलताना म्हणाले.
आदित्य ठाकरेंना लग्न करण्याचा सल्ला
आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिव संवाद आणि निष्ठा यात्रा सुरू केलीये. या सभांमधून आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना गद्दार संबोधून टीका करताना दिसताहेत. त्यावर रामदास कदम म्हणाले, ‘आदित्य ठाकरे खरा गद्दार आहे.’ प्लास्टिक बंदीच्या श्रेयवादावरून त्यांनी ही टीका केली.
उद्धवजींना म्हणालो, हे करू नका बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही -रामदास कदम
त्याचबरोबर ‘५० खोके’चा उल्लेख आदित्य ठाकरे हे सातत्यानं करत असून, त्याला रामदास कदमांनी उत्तर दिलं. ‘त्याला (आदित्य ठाकरे) म्हणावं लग्न करून बघ. बायको आल्यावर संसार कसा असतो ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न करून बघ मग तुला कळेल संसार काय? मग खोके काय असतात ते कळेल’, असंही रामदास कदम आदित्य ठाकरेंबद्दल बोलताना म्हणाले.
ADVERTISEMENT