चांदणी चौक मंगळवारी रात्री पुन्हा बंद राहणार : मुंबईहून साताऱ्याला जाणारी वाहतूक वळवली

मुंबई तक

• 04:38 AM • 04 Oct 2022

पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर आता तिथे लेन वाढविण्यासाठी लगतचे खडक फोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी सोमवारी दुपारी पाऊण तासांसाठी वाहतूक थांबवली होती. त्यानंतर आज (4 ऑक्टोबर) रात्री साडे अकरा ते (5 ऑक्टोबर) बुधवार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक 2 तासांसाठी बंद राहणार आहे. मुंबई ते सातारा […]

Mumbaitak
follow google news

पुणे : चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यानंतर आता तिथे लेन वाढविण्यासाठी लगतचे खडक फोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी सोमवारी दुपारी पाऊण तासांसाठी वाहतूक थांबवली होती. त्यानंतर आज (4 ऑक्टोबर) रात्री साडे अकरा ते (5 ऑक्टोबर) बुधवार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक 2 तासांसाठी बंद राहणार आहे.

हे वाचलं का?

मुंबई ते सातारा लेन बंद राहणार :

इथला खडक फोडण्यासाठी 16 ठिकाणी छिद्र घेऊन हा स्फोट करण्यात येणार आहे. यावेळी साताऱ्याहुन मुंबईकडे जाणारी वाहतूकही दहा ते पंधरा मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. स्फोट झाल्यानंतर लगेचच या मार्गाची वाहतुक सुरु होणार आहे.

मुंबईहुन साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गवरील वाहतूक प्रामुख्याने बंद राहणार आहे. ही वाहतूक राडारोडा हटविल्यानंतर रात्री दीडनंतर सुरू होणार आहे. यादरम्यान, ही वाहतूक वाकडमार्गे वळविण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे वाहतूक पोलीस उपायु्क्त आनंद भोईटे यांनी दिली. येथून शिवाजीनगर, कात्रजमार्गे पुढे जाता येईल.

ऐन सणाच्या काळात प्रवाशांना मनस्ताप :

चांदणी चौकातील पूल पाडण्याचे काम ऐन सणाच्या काळात सुरु केल्याने मोठ्या प्रमाणावर मनस्ताप असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. आधीच प्रचंड वाहतूक कोंडी, त्यात 2 ऑक्टोबरला मध्यरात्री पूल पाडण्यासाठी, त्यानंतर 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी लगतचा खडक फोडण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे ऐन सणाच्या दिवसांमध्ये प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

सोमवारी 20 मिनिटांसाठी वाहतूक थांबविली :

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जाहीर केल्याप्रमाणे, उर्वरित खडक फोडण्यासाठी सोमवारी दुपारी 3.48 वाजता महामार्गावरील वाहतूक 20 मिनिटे थांबवून स्फोट घडविण्यात आला. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी एक ते दोन तास नागरिकांना कोंडीत अडकण्याची वेळ आली. मुंबईकडून येणाऱ्या वाहनांची महामार्गावर पाषाण तलावापर्यंत कोंडी झाली होती. तर साताऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वारजे माळवाडीपर्यंत वाहतूक थांबली होती.

    follow whatsapp