Narayan Rane: ‘अजित पवार पुण्याला येऊन बारा वाजवीन मी’, ‘त्या’ विधानावरुन राणे संतापले

Narayan Rane expressed anger on Ajit Pawar Statement: मुंबई: ‘अजित पवार माझ्या फंदात पडू नका नाहीतर पुण्याला येऊन बारा वाजवीन मी. पुण्याला येऊन..’ असा इशाराच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना दिला आहे. ‘राणेंना एका बाईने पाडलं.. एका बाइने’ या अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन नारायण […]

Mumbai Tak

मुंबई तक

25 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 06:09 PM)

follow google news

Narayan Rane expressed anger on Ajit Pawar Statement: मुंबई: ‘अजित पवार माझ्या फंदात पडू नका नाहीतर पुण्याला येऊन बारा वाजवीन मी. पुण्याला येऊन..’ असा इशाराच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना दिला आहे. ‘राणेंना एका बाईने पाडलं.. एका बाइने’ या अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरुन नारायण राणे चांगलेच संतापलेले दिसून आले. पत्रकारांशी बोलताना राणेंनी आपला हा संताप व्यक्त केला. (ajit pawar statement on narayan rane bandra defeat rane got angry over)

हे वाचलं का?

पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले:

‘अजितदादाला बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं मला माहित नाही. खरं तर मला त्याबद्दल बोलायचंच नाही. तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना.. त्याबद्दल बोलू नये. बारामतीच्या बाहेर त्याने दुसऱ्यांचे बारसे करायला जाऊ पण नये. माझ्या फंदात पडू नका नाहीतर पुण्याला येऊन बारा वाजवीन मी. पुण्याला येऊन.. माझं कार्यक्षेत्र पहिलं मुंबई.. बाळासाहेबांनी मला कोकणात पाठवलं. तिकडून सलग सहा वेळा निवडून आलो आहे. त्यानंतर मला सांगितलं पक्षाने, सोनिया गांधींनी की, तुम्ही वांद्रेतून उभे राहा. त्यांच्या म्हणण्यानुसार उभा राहिलो. माझ्या मतदारसंघात नाही उभा राहिलो.’

‘नारायण राणेंना तर बाईने पाडलं.. बाईने..’, अजित पवारांची बोचरी टीका

‘महिला असो वा पुरूष असो… उमेदवार हा उमेदवार असतो. महिला आणि पुरुषात काय आहे. आता ती आहे का त्यांच्याकडे? आता कोणाकडे आहे म्हणावं?’

‘आता ठाकरे गट सगळं मी केलं.. मी केलं असं म्हणतील. आता केंद्राने सही होऊन नोटीफिकेशन कधी निघालं? ते कोणाच्या राजवटीत घडलं.. ते महत्त्वाचं आहे. उगाच मी केलं.. मी केलं. एक तर मराठी भाषेतील विशेषणं देखील योग्य जागी वापरता येत नाही..’ असं म्हणत राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

‘टिल्ल्या लोकांनी असलं काही…’, अजित पवारांकडून नितेश राणेंची हेटाळणी

अजित पवारांनी राणेंवर नेमकी काय केली होती टीका?

‘आता ५० खोके एकदम ओके.. असं आम्ही म्हणतो का.. असं जनता म्हणते. हे लोकांना नाही आवडत. मागे ज्या-ज्या वेळेस शिवसेनेला I(Shivsena) लोकांनी फोडण्याचा प्रयत्न केला किंबहुना आमच्याबरोबर असणाऱ्या भुजबळ साहेबांनी पण १९ लोकांना फोडलं. भुजबळ साहेबांसहीत सर्व लोकांना पराभूत करण्याचं काम जनतेनं केलं. केलं की नाही?.. नंतर साहेबांनी भुजबळ साहेबांना दिल्लीला नेलं, दिल्लीच्या राजकारणात.. नंतर मग विधानपरिषदेचं आमदार केलं.’

‘नारायणराव राणेंनी शिवसेना होते. तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडलं. बाईने पाडलं.. बाईने.. ही त्यांची प्रत्येकाची काय परिस्थिती आहे आणि काय टेंभा मिरवतात ही लोकं. यांचं काही खरं नाही. यांचा काही विचार करू नका.’ अशी थेट टीका अजित पवारांनी केली होती. त्यांच्या याच टीकेवरून आता राणेंना संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

    follow whatsapp