Aurangabad शहराचं नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर, Osmanabad चं नावही बदललं! - Mumbai Tak - changing the name of city aurangabad as chhatrapati sambhajinagar and osmanabad as dharashiv proposal of the state government has been approved by the central government - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा शहर-खबरबात

Aurangabad शहराचं नाव यापुढे छत्रपती संभाजीनगर, Osmanabad चं नावही बदललं!

Changing the name of city Aurangabad and Osmanabad: नवी दिल्ली: औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर या नावाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच उस्मानाबादचं नावही यापुढे धाराशिव असं असणार आहे. दोन्ही शहरांच्या नाव बदलण्याचा प्रस्ताव हा राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. याच प्रस्तावाला अखेर आज (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. (changing the name […]

Changing the name of city Aurangabad and Osmanabad: नवी दिल्ली: औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर या नावाला अखेर केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच उस्मानाबादचं नावही यापुढे धाराशिव असं असणार आहे. दोन्ही शहरांच्या नाव बदलण्याचा प्रस्ताव हा राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला होता. याच प्रस्तावाला अखेर आज (24 फेब्रुवारी) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. (changing the name of city aurangabad as chhatrapati sambhajinagar and osmanabad as dharashiv proposal of the state government has been approved by the central government)

दरम्यान, याबाबतच्या निर्णयाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नावं बदलण्याचा ज्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे त्याचा जीआर देखील फडणवीसांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

यासोबतच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये असंही म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!

संभाजीनगर नामांतर : जे सोबत आले नाहीत, त्यांची वाट लागणार – इम्तियाज जलील

फक्त शहरांची नावं बदलली, जिल्ह्याचं नाव तेच राहणार!

दरम्यान, नामांतराचा जो प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे त्यात फक्त औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचंच नाव बदलण्यात आलं आहे. या दोन्ही जिल्ह्यांची नावं ही पूर्वीप्रमाणेच असणार आहे.

शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरेंनी घेतलेला संभाजीनंगर, धाराशिवबद्दल निर्णय

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर काही दिवसांनी हे स्पष्ट झालं की, ठाकरे सरकार लवकरच कोसळणार. मात्र, आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरेंनी जी शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेतली होती त्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता.

मात्र, उद्धव ठाकरेंच्या सरकारने घेतलेला नामांतराचा निर्णय हा घाईघाईत होता. असं म्हणत शिंदे सरकारने ठाकरे सरकारचा हा प्रस्ताव रद्द केला होता.

औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं…

शिंदे-फडणवीस सरकारने नामांतराचा फेरप्रस्ताव केलेला सादर

औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतरांबाबत ठाकरे सरकारने घाईने निर्णय घेतले होते. 29 जूनला राज्यपालांनी बहुमत चाचणी घ्यायला सांगितलेली असताना आणि सरकार अल्पमतात असताना हे निर्णय घेतले गेले. त्यावर काही कायदेशीर बाबी निर्माण होऊ नयेत म्हणून फेरप्रस्ताव सादर करण्याचे आदेश आम्ही देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 16 जुलै 2022 रोजी सांगितलं होतं.

त्यावेळी एकनाथ शिंदे असं म्हणालेले की, ‘नामांतराबाबतच्या फेरप्रस्तावांना रितसर बहुमत असलेल्या सरकारने मान्यता दिली. त्यानुसार औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव, उस्माबादला धाराशिव हे नाव तर नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.’ असं एकनाथ शिंदे त्यावेळी म्हणाले होते.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला होणार फायदा?

दरम्यान, केंद्र सरकारने अचानक औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. एकीकडे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक अटीतटीची झालेली असतानाच नामांतराचा निर्णय जाहीर झाल्याने आता या निर्णयाचा भाजपला फायदा होणार का? असा सवाल काही जण उपस्थित करत आहेत.

Janhvi Kapoor: अ‍ॅडल्ट साइटवर होता जान्हवी कपूरचा फोटो… राघव-परिणीतीच्या लग्नाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ झोप येत नसेल तर हे करुन बघा, 60 सेकंदात झोप येईल लग्न नकोच! ‘या’ मराठी अभिनेत्री घटस्फोटानंतर सिंगल लाइफ करतायेत एन्जॉय Amitabh love story : पुण्यात बघितलं अन् पहिल्या नजरेतच खेळ खल्लास! ODI 2023: न्यूझीलंडला मोठा झटका, ओपनिंग सामन्यातून दिग्गज खेळाडू बाहेर! iPhone 15 Pro ला 40 हजारात खरेदी करण्याची संधी! फक्त हे करा… Rinku Rajguru : हर हर महादेव! आर्ची थेट पोहोचली केदारनाथ दर्शनाला ‘Animal’ साठी रणबीर नाही तर, साऊथचा सुपरस्टार होता पहिली चॉइस! पाकिस्तानचा संघ भारतात येताच, खेळाडूंनी केली ‘ही’ मागणी जिमला जाऊन नाही तर, अशाप्रकारे सुटलेलं पोट करा कमी… Ratan Tata यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणारी पोस्ट व्हायरल! चाहत्यांनी केला सॅल्यूट World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका!