परभणीत मॉब लिंचिंग! तीन तरुणांवर तुटून पडले, एकाचा जागेवरच मृत्यू

ADVERTISEMENT

maharashtra parbhani mob lynching three youths attacked by mob one boy died on the spot
maharashtra parbhani mob lynching three youths attacked by mob one boy died on the spot
social share
google news

Latest news in Marathi: दिलीप माने, परभणी: परभणीमध्ये (Parbhani) मॉब लिंचिंगचं (Mob Lynching) प्रकरण समोर आले आहे. येथे जमावाने शेळ्या चोरल्याच्या संशयावरून तीन मुलांना बेदम मारहाण केली. ज्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. खरे तर हे प्रकरण परभणी तालुक्यातील उखलद गावाशी संबंधित आहे. येथे शेळ्या चोरल्याच्या संशयावरून जमावाने तीन मुलांना बेदम मारहाण केली. त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. (maharashtra parbhani mob lynching three youths attacked by mob one boy died on the spot)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीन मुलांना जमावाच्या तावडीतून सोडवून थेट रुग्णालयात नेले. यावेळी उपचारादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला तर दोघांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर कारवाई करत 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर चौघांना अटक देखील केली आहे. तर इतरांचा आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार या मारहाणीत मृत्यू झालेल्या मुलाचं नाव किरपान सिंह सुजीतसिंह भाऊड असं आहे. किरपान सिंह आणि त्याचे दोन साथीदार हे हे उखलद गावातील निर्मनुष्य ठिकाणी संशयितरित्या फिरत होते. त्यामुळे गावकऱ्यांना ही तीनही मुलं चोर असल्याचं वाटलं आणि गावातील एका टोळक्याने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> नरेंद्र मोदींचा ‘क्लास’, देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीचा अर्थ काय?

यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. यावेळी मुंबई Tak च्या प्रतिनिधीने जिल्हा पोलीस अधीक्षकांशी देखील संपर्क साधला. मात्र, त्यांनीही बोलण्यास नकार दिला.

मॉब लिंचिंगच्या घटना

दरम्यान, याआधीही महाराष्ट्रात मॉब लिंचिंगच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सांगली जिल्ह्यात चार साधूंवर मुलांना पळवून नेल्याच्या संशयावरून जमावाने हल्ला केला होता. ही घटना जत तालुक्यातील लवंगा गावात घडली होती. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होते. हे चारही साधू यूपीचे रहिवासी होते जे कर्नाटकातील विजापूर येथून पंढरपूर मंदिराकडे कारने जात होते. त्यानंतर रस्ता विचारत असतानाच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Congress: ‘PM मोदी तर देवालाही समजावतील ब्रम्हांडात..’ राहुल गांधी असं का म्हणाले?

पालघरमध्ये मॉब लिंचिंगची घटनेने हादरलेला अवघा महाराष्ट्र

16 एप्रिल 2020 रोजी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात मॉब लिंचिंगची घटना घडली होती. ज्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला होता. येथे दोन साधूंसह 3 जणांना मुलं पळविणारी टोळी समजून गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. यावेळी जमावाने 70 वर्षीय साधू कल्पवृक्ष गिरी आणि 35 वर्षीय साधू सुशील गिरी यांच्यासह त्यांचा चालक नीलेश तेलगडे यांची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 250 जणांना अटक केली होती. दोन्ही साधू मुंबईहून सुरतला त्यांच्या कारने जात असताना पालघरच्या गडचिंचळे गावात जमावाने त्यांची हत्या केली होता. आता राज्य सरकार याबाबत सीबीआय चौकशी करणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT