Mumbai Tak /बातम्या / Maharashtra Rain: पुण्यासह चार जिल्ह्यांना IMD कडून इशारा, ठिकठिकाणी दाणादाण
बातम्या शहर-खबरबात

Maharashtra Rain: पुण्यासह चार जिल्ह्यांना IMD कडून इशारा, ठिकठिकाणी दाणादाण

live rain news in maharashtra today : ऐन होळी आणि धुळवड उत्सवाच्या काळात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. राज्यातील अनेक भागात गारपिटीसह झालेल्या पावसाने पिकांचं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज असून, हवामान विभागाने चार जिल्ह्यांसाठी अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झालं असून, अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईच्या फळबागांचे प्रचंड नुकसान झालं आहे.

चार जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने 8 मार्च रोजी राज्यातील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 9 मार्च रोजीही अहमदनगर, पुणे, बीड जिल्ह्यांत पाऊस होण्याचा शक्यता आहे.

फळाबागांचं प्रचंड नुकसान

राज्यातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये द्राक्ष, केळी, पपई यांच्या फळबागांना प्रचंड फटका बसला आहे. सोसाट्याचा वारा, गारपीट आणि पावसामुळे फळांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

विरोधकांकडून नुकसानभरपाईची मागणी

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. “एनडीआरएफच्या निकषाच्यापुढे जाऊन सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमची मागणी आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली का विचारलं, परंतु मागची मदत अजून मिळाली नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. 6 तारखेपासुन 9 तारखेपर्यंत हवामान बदलत जाईल असं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार घडलं देखील. आंबा, हरभरा, गहू, मका, द्राक्ष, कांदा यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मी नगर जिल्ह्यात देखील हे सगळं पाहिलं आहे”, असं सांगत अजित पवारांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.

विदर्भ, मराठवाड्यातही अवकाळी पावसाचा फटका

मध्य आणि उत्तर महाराष्ट्राबरोबरच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातही पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं.

मुंबईकरांना उकाड्यापासून मिळाला दिलासा

वातावरणात झालेल्या बदलांमुळे आणि पावसाच्या सरींमुळे मुंबईकरांना उकाड्यातून काही प्रमाणात दिलासा मिळाला. मुंबईत सोमवारी कमाल तापमान 39.3 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती.

2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव