महाराष्ट्रात मराठी भाषा शिकली पाहिजे, गुजराती समाजाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारीचं संबोधन

मुंबई तक

महाराष्ट्रात मराठी भाषा शिकली पाहिजे आणि इथली संस्कृती आत्मसात केली पाहिजे असं प्रतिपादन गुजाराथी समाजाला संबोधित करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे. गुजराती आणि राजस्थानी समाज जर मुंबईतून निघून गेला तर या शहराची आर्थिक राजधानी ही ओळख पुसली जाईल असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागच्या आठवड्यात केलं होतं. त्यानंतर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात मराठी भाषा शिकली पाहिजे आणि इथली संस्कृती आत्मसात केली पाहिजे असं प्रतिपादन गुजाराथी समाजाला संबोधित करत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

गुजराती आणि राजस्थानी समाज जर मुंबईतून निघून गेला तर या शहराची आर्थिक राजधानी ही ओळख पुसली जाईल असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागच्या आठवड्यात केलं होतं. त्यानंतर ज्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफीही मागितली. या सगळ्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात राहताना मराठी भाषा शिकली पाहिजे, असं म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी?

भारत हा सुंदर पुष्पगुच्छाप्रमाणे विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक राज्याची वेशभूषा, भाषा इत्यादी बाबतीत स्वतंत्र ओळख असली तरीही सर्व भारतीयांना जोडणारे राष्ट्रीय चारित्र्य समान आहे. देशातील राष्ट्रीयतेचा भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकाने आपली सांस्कृतिक ओळख जपताना स्थानिक संस्कृतीशी एकीकरण झाले पाहिजे. तसेच महाराष्ट्रात असताना मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.

गुजराती सांस्कृतिक फोरम या मुंबईतील सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ प्रसिद्ध गुजराथी व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सन्मानित करण्यात आले, त्यावेळी हे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp