लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याला दिलं दूध! पतीचा मूड बदलताच पत्नीने केला मोठा कांड...आख्ख्या कुटुंबालाच समजलं!
Groom And Bride First Night Viral News : उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीने नवऱ्यासोबत केलं धक्कादायक कृत्य!

पोलिसांकडून आरोपी नवरीचा शोध सुरु

त्या रात्री नेमकं घडलं तरी काय?
Groom And Bride First Night Viral News : उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका सामान्य व्यक्तीने मोठे स्वप्न पाहून आणि अपेक्षा ठेऊन लग्न केलं होतं. लग्नानंतर पहिल्याच रात्रीची (सुहागरात) मोठी तयारी केली होती. त्या दिवशी पत्नीने पतीसाठी किचनमधून एक ग्लास दूध आणला. पण दुसऱ्याच दिवशी संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. नवऱ्याने हिंमत दाखवल्याने आणि सतर्क राहिल्याने या घटनेचा पर्दाफाश झाला. नवरीबाबत धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा-नवरीमध्ये नेमकं घडलं तरी काय?
सीता नगरमध्ये राहणाऱ्या कुसुमाचा मुलगा रिंकूचं लग्न 4 मे रोजी झालं होतं. रिंकूचं लग्न आतिमा नावाच्या मुलीसोबत करण्यात आलं होतं. लग्नाच्या रात्री नवरीने रिंकू आणि तिच्या आईला गुंगीचं औषध मिक्स केलेलं दूध देऊन बेशुद्ध केलं आणि घरात असलेले सर्व दागिने घेऊन फरार झाली.
ही खळबळजनक घटना घडल्याने रिंकू आणि तिच्या कुटुंबियांना धक्का बसला.
हे ही वाचा >> सृष्टी WhatsApp वर पाठवायची मुलींचे 'ते' फोटो, 'तो' घाणेरडा खेळ सुरू करणारी महिला अन्...
त्यानंतर त्यांनी घडलेल्या प्रकाराचा तपास सुरु केला. लग्नसमारंभात नवरीचे आत्या आणि मामाच्या जागी बोगस व्यक्ती उभा केल्याचा त्यांना संशय होता. अनेक दिवस त्यांनी नगला पदी परिसरात रेकी करून संशयास्पद लोकांना ओळखलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनीता आणि राजेंद्रला अटक केली.
पोलीस तपासात दोन्ही आरोपींनी कबूल केलं की, त्यांना नवरीसोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही. त्यांना मध्यस्ती व्यक्तीने पैसे देऊन बोगस आत्या-मामा बनवले होते. खरे नातेवाईल वाटवं म्हणून हे लोक पाहूण्यांसोबत गप्पा मारत होते, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. लग्न जुळवणारा मध्यस्ती व्यक्तीच या घटनेचा मास्टरमाईंड निघाला आहे. ज्याने संपूर्ण प्लॅन केला आणि लग्न जुळवण्यासाठी खोट्या माहितीचा आधार घेतला. पीडित कुटुंबियांचा आरोप आहे की, त्यांनी पोलिसांना सुरुवातीपासूनच ट्रान्स यमुना क्षेत्रात राहणाऱ्या मध्यस्ती व्यक्तीबाबत सांगितलं होतं.
हे ही वाचा >> मोठा गेम झाला यार... लॉटरीचे 30 कोटी घेऊन गर्लफ्रेंड पळाली भलत्याच पुरूषासोबत!
याचदरम्यान पती रिंकूवर हल्लाही करण्यात आला होता. दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपींवर वेळेत कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे पीडित कुटुंबियांनी भाजप आमदार डॉ. धर्मपाल सिंग यांना संपर्क केला. त्यानंतर सिंग यांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली. पोलिसांकडून आरोपी नवरीचा शोध सुरु आहे.