कोण होते ते VIP गेस्ट? ज्यांना 'एक्स्ट्रा सर्व्हिस' न दिल्याने अंकिता भंडारीची माजी भाजप नेत्याच्या मुलाने केलेली हत्या!

मुंबई तक

अंकिता भंडारी हत्ये प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मात्र तरीही यामधील काही प्रश्न ही अनुत्तरितच असल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

अंकिता भंडारीची माजी भाजप नेत्याच्या मुलाने केलेली हत्या!
अंकिता भंडारीची माजी भाजप नेत्याच्या मुलाने केलेली हत्या!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अंकिता भंडारी केसमधील नवीन खुलासे

point

स्पेशल सर्व्हिस मिळणारे 'ते' VIP पाहुणे नेमके कोण?

point

रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीची माजी भाजप नेत्याच्या मुलाकडून हत्या

Ankita Bhandari Case: उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या अंकिता भंडारीची वयाच्या 19 व्या वर्षीच हत्या करण्यात आली होती. अंकिता पौडी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर विधानसभा परिसरातील एका प्रायव्हेट रिसॉर्टमध्ये म्हणून काम करत होती. अंकिता भंडारी हत्ये प्रकरणी पोलिसांनी रिसॉर्टचे मालक पोलिसांनी रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य, मॅनेजर सौरभ भास्कर आणि असिस्टंट मॅनेजर अंकित गुप्ता यांना अटक केली होती. 

31 मे रोजी कोटद्वार येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाने या तिघांना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळाली असली तर यामधील काही प्रश्न ही अनुत्तरितच असल्याचं समोर आलं आहे. 

व्हॉट्सअॅप चॅटवरून खुलासे

अंकिताचा मित्र पुष्प दीप याच्या व्हॉट्सअॅपमधून बरेच खुलासे झाल्याचे समोर आलं आहे. रिसॉर्टचा मालक आणि हत्येतील आरोपी पुलकित आर्य याची रिसेप्शनिस्ट अंकितावर आधीच वाईट नजर असल्याचं चॅटमध्ये उघड झालं. त्याने अंकिताला त्याच्या शेजारील रूममध्ये शिफ्ट केलं होतं. 

उत्तराखंडातील राज्यमंत्री असलेले विनोद आर्य यांचा धाकटा मुलगा पुलकित हरिद्वारमध्ये राहत होता आणि तो रिसॉर्टमध्ये राहायचा. त्याने अंकिताला रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामावर ठेवले होते. अंकिताला सोडून तिथे कोणतीही महिला कर्मचारी नव्हती. इतकेच नव्हे तर रिसॉर्टमध्ये गेस्टसुद्धा खूपच कमी येत होते. रिसॉर्टमधील खोल्या रिकाम्याच होत्या. रिसॉर्ट कधीकधी फक्त पार्ट्यांसाठी बुक केले जात असे. अंकिताने तिथे महिला कर्मचारी का नाहीत? असं विचारलं देखील होतं. त्यावर चोरी झाल्यामुळे एका मुलीला काढून टाकण्यात आल्याचं तिला सांगण्यात आलं.

VIP पाहुण्यांना स्पेशल सर्व्हिस

रिसेप्शनिस्ट अंकितावर रिसॉर्टमध्ये येणाऱ्या VIP पाहुण्यांना स्पेशल सर्व्हिस देण्यासाठी दबाव आणला जात होता आणि हे व्हाट्सअॅप चॅटमधून समोर आलं. त्या मेसेजमध्ये अंकिताने तिच्या मैत्रिणीला लिहिले होते, "मी जरी गरीब असले तरी मी स्वतःला १० हजार रुपयांना विकणार नाही...". या घटनेच्या काही दिवसांच्या चौकशीनंतर, उत्तराखंडचे तत्कालीन डीजीपी अशोक कुमार यांनी त्यांच्या निवेदनात अंकितावर वाईट कृत्ये करण्यासाठी दबाव आणल्याबद्दल सांगितलं होतं. अशात या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली असली तरीही रिसॉर्टमध्ये आलेल्या कोणत्या VIP पाहुण्यांना स्पेशल सर्व्हिस देण्यात आली होती? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.

हे ही वाचा: आईचे परपुरूषासोबत लिव्ह-इन संबंध, मुलाच्या कृत्याने सगळेच हादरले!

अंकिताच्या जवळ येण्याचा प्रयत्न

दरम्यान, रिसॉर्टचा मालक पुलकितने त्याची रिसेप्शनिस्ट अंकिताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याने अंकिताला स्कूटर आणि कार चालवायला शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो म्हणायचा की "बऱ्याचदा रिसॉर्टमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना टूरसाठी घेऊन जावे लागते, म्हणून गाडी कशी चालवायची हे माहित असले पाहिजे." व्हॉट्सअॅप चॅटवरून असं समोर आलं की एकदा पुलकितने अंकिताला सांगितले की "रिसॉर्टमध्ये जास्त पाहुणे येणार आहेत आणि खोल्या कमी नाहीत, म्हणून तुला माझ्या शेजारच्या खोलीत शिफ्ट व्हावं लागेल." खरंतर, पुलकित रिसॉर्टमध्ये ज्या खोलीत राहायचा त्यात आतमध्ये दोन खोल्या होत्या. पण त्या एकमेकांशी जोडलेल्या होत्या. अंकिता एक-दोन दिवस त्याच्या शेजारच्या खोलीत एकटीच राहिली. यादरम्यान, पुलकितने रात्री अंकिताच्या खोलीत दारू पिऊन तिला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. याचा विरोध केल्यानंतर पुलकितने दुसऱ्या दिवशी तिची माफी मागितली आणि म्हणाला, "मला माफ कर... मी दारू प्यायली होती."

नेमकी घटना काय?

अंकिता 18 ते 19 सप्टेंबर 2022 पासून बेपत्ता होती. जिल्हा पॉवर हाऊसजवळील शक्ती कालव्यात पोलीस आणि एसडीआरएफ पथकांद्वारे शोध मोहीम सुरू होती. 24 सप्टेंबर रोजी सकाळी पोलिसांना चिल्ला पॉवर हाऊसजवळ अंकिताचा मृतदेह आढळला. त्यावेळी आरोपी सौरभने पोलिसांना सांगितले की "अंकिता आणि पुलकितमध्ये वाद झाला होता. अंकिता तिच्या मैत्रिणींमध्ये आमची बदनामी करायची. ती आमच्यातील बोलणं मित्र आणि मैत्रिणींना सांगायची आणि आम्ही तिला ग्राहकांशी संबंध ठेवायला सांगितले, असं सांगायची. यावेळी झालेल्या हाणामारीत आम्ही रागाच्या भरात तिला ढकलले आणि ती कालव्यात पडली." 

हे ही वाचा: मनोहरलाल धाकडसोबत नग्न अवस्थेत असणारी महिला कोण? सत्य आलं समोर

अंकिता भंडारी प्रकरणात, सरकारने स्वतःच निर्णय लवकरात लवकर मिळावा यासाठी वकिली केली असल्याचा सरकारचा युक्तिवाद आहे. पोलिस आणि एसआयटीच्या वकिलीमुळे गुन्हेगारांना जामीन मिळाला नाही. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, एका महिला अधिकाऱ्याला एसआयटीचे अध्यक्ष बनवण्यात आले. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने एसआयटी तपास समाधानकारक मानला आणि प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची याचिका फेटाळली, असं सरकराचं म्हणणं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp