Chhagan Bhujbal : “हा अध्यादेश नाही, तर…”, भुजबळांचा मराठा समाजाला मेसेज काय?

भागवत हिरेकर

Chhagan Bhujbal Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर शिंदे सरकारने सगेसोयरे शब्दाची व्याख्या करण्यासंदर्भातील अध्यादेश काढण्यासाठी अधिसूचना काढली. त्याबद्दल भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

ADVERTISEMENT

Chhagan Bhujbal First Reaction on Notification Regarding maratha reservation ordinance
Chhagan Bhujbal First Reaction on Notification Regarding maratha reservation ordinance
social share
google news

Chhagan Bhujbal News : “मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय. पण, मला काही तसं पूर्णपणे वाटत नाही. एक तर झुंडशाहीने नियम, कायदे बदलता येत नाही. आम्ही सुद्धा शपथ घेताना कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ. कुणाला झुकतं माप न देता काम करू अशी शपथ घेतो”, असे म्हणत कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारने काढलेल्या अधिसूचनेबद्दल स्पष्ट मतं मांडली.

राज्य सरकारने अधिसूचना काढल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन स्थगित केले. अधिसूचनेबद्दल भुजबळ म्हणाले, “ही जी आहे एक सूचना आहे. याचं रुपांतर नंतर होणार आहे. १६ फेब्रवारीपर्यंत यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील आणि इतर समाजातील जे वकील असतील, सुशिक्षित असतील त्यांनी याचा अभ्यास करून अशा प्रकारच्या हरकती या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत. लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्यात. ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा हरकती पाठवाव्यात जेणेकरून सरकारला लक्षात येईल की, याला दुसरी बाजू आहे. मत आहे.”

सगे सोयरे शब्द टिकणार नाही, भुजबळ यांचं मत

“माझी सगळ्यांना विनंती आहे की, नुसतं दुसऱ्या ढकलून किंवा चर्चा करून हे होणार नाही. कृती करावी लागेल. तुम्हाला यावर हरकती घ्याव्या लागतील. आम्ही समता परिषदेच्या माध्यमातून यावर योग्य प्रकारची कारवाई करू”, असेही भुजबळांनी सांगितले.

“माझं स्वतःचं मत असे आहे की, सगे सोयरे जे आहे, ते कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही. यामध्ये मला मराठा समाजाच्याही निदर्शनास आणून द्यायचं आहे की, तुम्ही ओबीसींच्या १७-१८ टक्के आरक्षणात येण्याचा आनंद तुम्हाला वाटतोय. तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय. पण, तुम्ही दुसरी बाजू लक्षात घ्या की, या १७ टक्क्यांत जवळपास ७५ टक्के लोक येतील. ईडब्ल्यूएसखाली तुम्हाला १० टक्के आरक्षण मिळत होतं. ते आता यापुढे मराठा समाजाला मिळणार नाही. खुल्या प्रवर्गात जे ४० टक्के होते, त्यात जे तुम्हाला आरक्षण मिळत होतं. ते आता तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही ५० टक्क्यांत तुम्हाला संधी होती, ती संधी तुम्ही गमावली आहे. तुम्हाला आता ३७४ जातींबरोबर झगडावं लागेल”, असे भुजबळ मराठा समाजाला म्हणाले.

“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणत तुम्ही मागच्या दाराने येताहेत. पण, त्यामुळे तुमची ५० टक्क्यांमधील संधी गमावून बसलात हे विसरता येणार नाही. जात ही जन्माने येते, ती एखाद्याच्या शपथपत्राने येते का? जात मूळात जन्माने माणसाला मिळत असते. त्यामुळे असं जर कुणी म्हणत असेल की आम्ही शपथपत्र देऊ, तर अजिबात हे होणार नाही. हे कायद्याच्या विरोधात होईल.”

हे वाचलं का?

    follow whatsapp