मुलांचे भांडणं सोडवायला गेलेल्या आईलाच संपवलं, पाणी भरताना काय घडलं?

मुंबई तक

Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील इटौंजामध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका किरकोळ वादातून 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेचा नातू हा पाणी आणण्यासाठी गेला असताना त्याचा इतर काही मुलांसोबत वाद झाला. त्यानंतर त्या वादाचे रुपांतर हे भांडणात झाले. या हाणामारीत निष्पाप महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

ADVERTISEMENT

crime news woman murdered after going to resolve children's dispute
crime news woman murdered after going to resolve children's dispute
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेचा नातू हा पाणी आणण्यासाठी गेला असताना त्याचा इतर काही मुलांसोबत वाद

point

एका किरकोळ वादातून 40 वर्षीय महिलेचा मृत्यू

Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील इटौंजामध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका किरकोळ वादातून 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेचा नातू हा पाणी आणण्यासाठी गेला असताना त्याचा इतर काही मुलांसोबत वाद झाला. त्यानंतर त्या वादाचे रुपांतर हे भांडणात झाले. या हाणामारीत निष्पाप महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा : ईदच्या दिवशी बकरी नव्हे, स्वत:च्याच मानेवरून फिरवला चाकू..यामागचं कारण वाचून हादरूनच जाल!

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, इटौंजा पोलीस ठाणे परिसरात भगवतीपूर येथील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या सुनीता नावाच्या एका महिलेचा नातू पाणी आणण्यासाठी गेला. यादरम्यान, त्याची इतर काही मुलांसोबत भांडण झाली. ही अगदी किरकोळ होती. मात्र, यामुळे रक्तरंजीत परिस्थिती निर्माण झाली. 

अशावेळी काही लोक आले आणि त्यांनी निष्पाप महिलेला लाथा घातल्या आणि तिला विटा फेकून मारल्याचा आरोप करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांचे नाव हे राजकुमार, रामकिशोर, आणि कमलापूर असे हल्लेखोरांची नावे आहेत. 

या झटापटीत गंभीर जखमी झालेल्या महिलेला रामसागर रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशावेळी उपचादारम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी काही तासानंतर पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी कापी तासातच आरोपीला अरंबा कालव्यातून अटक करण्यात आली. 

हेही वाचा : बुधवार पेठेत वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिलेचा रिक्षा चालकाकडून खून, नेमकं घडलं तरी काय?

दरम्यान, डीसीपी नॉर्थ झोन गोपाल चौधरी म्हणाले की, पीडितेचा पती मांझी यांच्या तक्रारीवरुन इटौंजा पोलीस ठाण्यात  हत्येच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपी वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. या संबंधित प्रकरणात आरोपीवर खोलवर तपास सुरू आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp