Crime : जादूटोण्याच्या संशयातून गळा घोटला,नंतर रॉडने...; भयंकर घटनेने चंद्रपूर हादरलं - Mumbai Tak - suspicion of witchcraft strangulated superstition man killed chandrapur crime story - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Crime : जादूटोण्याच्या संशयातून गळा घोटला,नंतर रॉडने…; भयंकर घटनेने चंद्रपूर हादरलं

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तहसील गावातील डोनी गावात ही घटना घडली आहे. या घटनेत अमृत बाजीरावची जादूटोणा करण्याच्या संशयातून हत्या करण्यात आली आहे. अमृत बाजीरावचे गावातीलच विजयपाल आलम सोबत जमिनीवरून वाद सुरु होता.
suspicion of witchcraft strangulated superstition man killed chandrapur crime story

चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जादूटोणा करण्याच्या संशयातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. 55 वर्षीय अमृत बाजीराव असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपी आणि अमृत बाजीरावमध्ये जमीनीवरून वाद सूरू होता. या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे, तसेच आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. (suspicion of witchcraft strangulated superstition man killed chandrapur crime story)

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तहसील गावातील डोनी गावात ही घटना घडली आहे. या घटनेत अमृत बाजीरावची जादूटोणा करण्याच्या संशयातून हत्या करण्यात आली आहे. अमृत बाजीरावचे गावातीलच विजयपाल आलम सोबत जमिनीवरून वाद सुरु होता. या वादातूनच विजयपाल आलमने गावातील फंक्शन हॉलमध्ये गळा दाबून अमृत बाजीरावची हत्या केली. यानंतर रॉडने डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एसपी रविंद्र सिंह परदेसी त्यांच्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

हे ही वाचा : Mumbai-Goa Highway : ‘चमकोमॅन’ वर भरोसा ठेवणार का..?, मनसेने भाजप नेत्याला डिवचले

ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, अमृत बाजीरावची गावातील आरोपी विजयपाल आलम (35) सोबत जमीनीवरून वाद सुरु होता. या माहितीनंतर पोलिसांनी विजयपाल आलमला ताब्यात घेतले.यावेळी विजयपाल आलमची चौकशी केली असता त्याने गु्न्ह्याची कबूली दिली. तसेच हत्येमागचं कारण देखील सांगितले आहे.

आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि बाजीरावमध्ये जमिनीवरून सतत वाद व्हायचा. या वादातून अमृत बाजीराव सतत जादूटोणा करून जीवे ठार मारण्याची धमकी द्यायचा. या धमकीमुळे विजयपालमध्ये मनात भिती बसली होती. आणि बाजीराव जादूटोणा करून हत्या करेल असा संशय होता. त्यामुळे हा जादूटोणा आणि भिती त्याच्यात इतकी बसली की त्याने त्याच्याच हत्येचा कट रचला,आणि संधी मिळताच गावातील हॉलमध्ये त्याची हत्या करण्यात आली.

पोलीस चौकशीत अमृत बाजीराव यांची डोनी गावात गळा आवळून हत्या केली होती. तसेच आरोपी विजयपाल आलमने हत्येची कबूली दिली आहे. दोघांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातून मृत अमृत बाजीरावने आरोपीला जादूटोणा करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीतूनच आरोपीने विजयपालने अमृत बाजीरावची हत्या केली,अशी माहिती पोलिस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी यांनी दिली.

हे ही वाचा : Zareen Khan : प्रसिद्ध अभिनेत्रीला होणार अटक…, नेमकं प्रकरण काय?

World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार?