Lok sabha election 2024 : काँग्रेसकडे निवडणूक लढवायला पैसे का नाही? राहुल गांधींनी दिले उत्तर

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

congress bank account Latest Update : काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या कारवाईनंतर राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी यांनी संताप व्यक्त केला.

social share
google news

Congress Bank Account News : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मोठ्या पेचात अडकली आहे. यासंदर्भात गुरुवारी (21 मार्च) काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद झाली. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी सरकारवर तोफ डागली. 

'निवडणूक लढवायला पैसे नाहीत'

यावेळी काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले की, "काँग्रेस पक्षाचा निधी वापरण्यास सक्षम नाही. आम्ही प्रसिद्धीसाठी पैसे खर्च करू शकत नाही. ही कसली लोकशाही? आमच्यावर 30 ते 35 जुनी केसेस उघडून ते आम्हाला पैसे वापरू देत नाहीत."

"उमेदवारांना देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत", असे माकन म्हणाले. "आमच्याकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत. आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला जारी केलेली नवीन नोटीस १९१४-१९९५ मधील आहे. 14 मार्च रोजी ही नोटीस देण्यात आली होती. ही बाब 30 वर्षे जुनी असून आताच ही नोटीस का बजावण्यात आली आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शिंदेंच्या सेनेच्या 'या' जागांवर भाजपचा कब्जा! 

अजय माकन म्हणाले की, "प्रत्येक राजकीय पक्षाला करातून सूट देण्यात आली आहे. अशा स्थितीत काँग्रेसला आयकर नियम लागू होत नसताना आम्हाला का टार्गेट केले जात आहे? आम्हाला 100 टक्क्यांहून अधिक दंड ठोठावण्यात आला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या बँक खात्यातून जबरदस्तीने 115 कोटी रुपये बँकांमध्ये ट्रान्सफर केले आहेत."

'खाती गोठवली नाहीत, लोकशाही गोठवली'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी म्हणाले की, "बँक खाती गोठवली गेली नसून भारताची लोकशाही गोठवली जात आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्यावर केलेली ही गुन्हेगारी कारवाई आहे", असे ते म्हणाले. 

"महिनाभरापूर्वी काँग्रेसची सर्व खाती गोठवण्यात आली होती. कोणत्याही कुटुंबाचे खाते गोठवले तर ते उपाशी मरते. पण आमची खाती गोठवल्यावर कोणीही काहीही केले नाही. निवडणूक आयोगासह सर्वांनीच मौन बाळगले आहे. भारतातील वीस टक्के लोक आम्हाला मतदान करतात, पण आम्ही दोन रुपये देऊ शकत नाही."

ADVERTISEMENT

ते म्हणाले की, "आम्ही प्रचार करू शकत नाही. आमचे नेते विमानाने जाऊ शकत नाहीत. इतकंच काय तर ते रेल्वेनेही जाऊ शकत नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून हेच काम सुरू आहे. आमच्या आर्थिक पुरवठा संपूर्णपणे रोखला आहे. हे पंतप्रधान आणि गृहमंत्री करत आहेत. आज भारतात लोकशाही नाही. भारताची लोकशाही ही खोट्याची पोळी आहे."

मल्लिकार्जून खरगे कारवाईवर काय म्हणाले?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणुका आवश्यक आहेत. सत्तेत असलेल्यांचीच संसाधनांवर, माध्यमांवर मक्तेदारी असावी, असे होऊ नये. ईडी, निवडणूक आयोग, आयकर विभागासारख्या घटनात्मक आणि न्यायिक संस्थांवर सत्ताधारी पक्षाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रण असावे, असे होऊ नये.

हेही वाचा >> 'वंचित'शिवाय 'महा विकास आघाडी' करणार जागावाटपावर शिक्कामोर्तब?

ते म्हणाले की, 'दुर्दैवाने नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर निवडणूक रोख्यांबाबत जे तथ्य समोर आले आहे, ते चिंताजनक आणि लज्जास्पद आहे. यामुळे देशाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. गेल्या ७० वर्षांत आपल्या देशात निर्माण झालेल्या निष्पक्ष निवडणुका आणि निरोगी लोकशाहीच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.'

सत्ताधारी पक्ष धोकादायक खेळ खेळतोय -खरगे

खरगे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने जे निवडणूक देणगी बाँड बेकायदेशीर आणि घटनाबाह्य ठरवले होते. त्यातून सध्याच्या सत्ताधारी पक्षाने आपल्या खात्यात हजारो कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे, तर दुसरीकडे मुख्य विरोधी पक्षाचे बँक खाते षडयंत्र रचून गोठवण्यात आले आहे, जेणेकरून आम्ही निवडणूक लढवू नाही. सत्ताधारी पक्षाचा हा धोकादायक खेळ आहे, त्याचे दूरगामी परिणाम होतील कारण लोकशाही वाचवायची असेल तर समानता असली पाहिजे.

ते म्हणाले की, तुम्ही भाजपचा खर्च पाहा, त्यांच्या जाहिराती सर्वत्र आहेत. वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ आणि इंटरनेटवर कोट्यवधी रुपयांचे मोठमोठे मोठमोठे रॅली आणि रोड शो होत आहेत. देशातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपची पंचतारांकित कार्यालये बांधण्यात आली आहेत. हा पैसा कुठून आला? पैशाशिवाय हे होत आहे का?

सर्वोच्च न्यायालय वस्तुस्थिती तपासत असल्याने भाजपने कंपन्यांकडून हे पैसे कसे घेतले हे मला सांगायचे नाही, असे खरगे म्हणाले. आम्हाला आशा आहे की लवकरच सत्य सर्वांसमोर येईल. मी देशातील घटनात्मक संस्थांना आवाहन करतो की, जर त्यांना निष्पक्ष निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यांनी आमच्या पक्षाला कोणत्याही निर्बंधाशिवाय बँक खाती वापरण्याची परवानगी द्यावी. राजकीय पक्ष कर भरत नाहीत. भाजपने कधीच भरला नाही. असं असतानाही आमच्याकडून कराची मागणी होत असेल, तर आम्ही न्यायालयाच्या अंतिम निर्णयाची वाट पाहू.

पंतप्रधान काँग्रेसला पंगू करण्याचा प्रयत्न करताहेत - सोनिया गांधी

यादरम्यान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. भाजपला इलेक्टोरल बाँड्सचा खूप फायदा झाला आहे. पंतप्रधान काँग्रेसला पंगू करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. हा लोकशाहीवरचा हल्ला आहे", असे त्या म्हणाल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT