Lok Sabha 2024 : मराठा उमेदवारांमुळे महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर मतदान?

भाग्यश्री राऊत

Lok Sabha Election 2024 EVM : मराठा समाजाने प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Lok Sabha Election 2024 : मनोज जरांगे यांचं समर्थन करण्यासाठी गावातून लोकसभा निवडणुकीत 3 उमेदवार देऊन त्याचा सर्व खर्च लोक वर्गणीतून करायचा आहे. हा ठराव आहे धाराशिव जिल्ह्यातील सावरगावमधला! एका गावातून 3 उमेदवार लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतलाय...हे झालं आहे फक्त एका गावात... पण, अख्ख्या मराठवाड्यातल्या प्रत्येक गावातून असे उमेदवार निवडणुकीला उभे करण्याचा निर्णय घेतलाय... म्हणजे एका जिल्ह्यातून हजारो उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असतील. मग इतके उमेदवार असतील तर ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेणं शक्य आहे का? ईव्हीएमच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आल्यास मतदान बॅलेट पेपरवर घेतलं जाऊ शकतं का? (is it possible to conduct voting by EVM, if 1000 candidates contest lok sabha election)

एका गावातून किंवा एका ग्रामपंचायतीतून 3 उमेदवार निवडणुकीत अर्ज दाखल करणार असतील तर एकट्या धाराशिव जिल्ह्यात 622 ग्रामपंचयती आहेत. म्हणजे एकट्या धाराशिव जिल्ह्यातून 1800 पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असतील... 

ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरचा मुद्दा का आला चर्चेत?

कोणत्या जिल्ह्यात ही संख्या पाच हजारांच्या वरही जाऊ शकते... त्यामुळेच धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. या पत्रात नेमकं काय म्हटलंय? यावर एक नजर टाकुयात.... 

आरक्षणामुळे मराठा समाजाकडून लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकतात. अशा परिस्थितीत ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्यात अडचण येईल. मतपत्रिका आणि मतपेट्यांचा वापर करून निवडणूक घ्यायची झाल्यास तितकंच मनुष्यबळही लागणार आहे. उमेदवार जास्त झाल्यास मतपत्रित मोठी होईल आणि मतपेट्यांची संख्याही वाढेल...अशा परिस्थितीत काय करायचं असा प्रश्न धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाला विचारलाय...

    follow whatsapp