राज ठाकरेंचं भाषण राज्याची शांतता आणि सुरक्षेसाठी धोकादायक, AAP कडून कारवाईची मागणी

मुंबई तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेचे पडसाद तात्काळ उमटायला सुरुवात झाली आहे. 3 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले गेलेच पाहिजेत नाहीतर 4 तारखेपासून मी ऐकणार नाही असं म्हणत लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. परंतू आम आदमी पक्षाने आता राज यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. राज ठाकरे यांचं भाषण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेचे पडसाद तात्काळ उमटायला सुरुवात झाली आहे. 3 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे उतरले गेलेच पाहिजेत नाहीतर 4 तारखेपासून मी ऐकणार नाही असं म्हणत लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. परंतू आम आदमी पक्षाने आता राज यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांचं भाषण हे राज्याची शांतता आणि सुरक्षेला थेट धोका पोहचवणारं आहे. यासाठी राज ठाकरेंवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी केली आहे.

राज ठाकरेंचं भाषण अखेरच्या टप्प्यात आलेलं असताना औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतीक मंडळाच्या मैदानाजवळ असलेल्या मशिदीवरुन अजानाला सुरुवात झाली. ज्यानंतर राज यांचा पारा चढलेला पहायला मिळाला. सभेला उपस्थित पोलिसांना राज यांनी आव्हान करत यांच्या तोंडात बोळे कोंबा आणि तात्काळ अजान बंद करा अशी मागणी केली. ज्यानंतर उपस्थित समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झालेली पहायला मिळाली.

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी – औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंचा घणाघात

हे वाचलं का?

    follow whatsapp