‘उद्धव ठाकरे, तुम्ही उलट्या काळजाचे’; सुप्रिया सुळेंचं नाव घेत आशिष शेलारांचं टीकास्त्र
शरद पवारांनंतर महाराष्ट्रात विश्वासघात कुणी केला असेल, तर उद्धव ठाकरे यांनी केला आहे, असं म्हणत भाजपने नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या मुलाखतीचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत ठाण्यातील पालापाचोळा असं म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केली. यावर बोट ठेवत शेलारांनी सुप्रिया सुळेंना सवाल केला. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर आशिष शेलार काय म्हणाले? “उद्धव ठाकरेंनी आपल्याच विदूषकासमोर […]
ADVERTISEMENT

शरद पवारांनंतर महाराष्ट्रात विश्वासघात कुणी केला असेल, तर उद्धव ठाकरे यांनी केला आहे, असं म्हणत भाजपने नेते आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या मुलाखतीचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत ठाण्यातील पालापाचोळा असं म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केली. यावर बोट ठेवत शेलारांनी सुप्रिया सुळेंना सवाल केला.
उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर आशिष शेलार काय म्हणाले?
“उद्धव ठाकरेंनी आपल्याच विदूषकासमोर मुलाखत दिलीये. त्यामुळे भाजपने यावर भाष्य करावं की,नाही हा प्रश्न आहे. भाष्य केलंही नसतं, पण सातत्यानं भाजपचा उल्लेख आणि इशारे देण्याचा प्रयत्न केला.”
“जेव्हा मुख्यमंत्रीपदावर बसले तेव्हा भाजपला इशारे. जेव्हा शिवसैनिकांनी त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार केलं, त्यानंतरही भाजपलाच इशारे. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळे आहे.”
“सुप्रिया सुळे, हा महाराष्ट्रद्रोह नाही का?”
“भाजपबद्दल बोलणं, इशारे देणे, टोमणे मारणे, असं केलं तरच त्यांना महाराष्ट्रात स्थान उरेल. अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांची ही वाईट खोड सहजासहजी जाणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर कुणी पालापाचोळा म्हणत असेल, तर हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कटकारस्थान आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला घालून पाडून अपमानित करणं, हे महाराष्ट्राला मान्य नव्हे. आता सुप्रिया सुळे यावर काही बोलणार आहेत का, हा महाराष्ट्रद्रोह नाही का?”