मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे-अनिल देशमुख
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर एक संशयित स्कॉर्पिओ पोलिसांना आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. या घटनेच्या एक दिवस आधी ही कार चोरीला गेली होती. आज […]
ADVERTISEMENT

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. २५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेर एक संशयित स्कॉर्पिओ पोलिसांना आढळली होती. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. या घटनेच्या एक दिवस आधी ही कार चोरीला गेली होती.
आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत आढळला आहे. हे प्रकरण NIA कडे अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावं अशी मागणी विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कार प्रकरणात अनेक योगायोग आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं. तसंच सचिन वाझे हे पोलीस अधिकारी घटना जिथे घडली तिथे सर्वात आधी कसे पोहचले असाही प्रश्न उपस्थित केला होता.
मनसुख हिरेन हे कालपासून बेपत्ता होते, ते बेपत्ता असल्याची तक्रार ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. आज विधानसभेत अँटेलिया बाहेरच्या कारचा आणि त्या घटनेचा मुद्दा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला तेव्हा त्यांनी या प्रकरणातल्या योगायोगांकडे सरकारचं लक्ष्य वेधलं. तसंच मनसुख हिरेन यांना सुरक्षा देणं आवश्यक आहे असंही म्हटलं होतं. सचिन वाझे हे त्या ठिकाणी कसे पोहचले? क्रॉफर्ड मार्केटमध्ये मनसुख हिरेन हे नेमके कुणाला भेटले होते? असे सगळे प्रश्न उपस्थित केले होते.
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण CBI कडे सोपवावं-नारायण राणे