अमरावती : बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, संतप्त नागरिकांकडून जाळपोळ
–धनंजय साबळे, अमरावती अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या रिद्धपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनेचा निषेध केला. नागरिकांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला. घटनेनंतर गावात तणावर पसरला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आणि प्रशासनाने आंबेडकरी जनतेला शांतता पाळण्याचं […]
ADVERTISEMENT

–धनंजय साबळे, अमरावती
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात असलेल्या रिद्धपूर गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी घटनेचा निषेध केला. नागरिकांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला.
घटनेनंतर गावात तणावर पसरला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आणि प्रशासनाने आंबेडकरी जनतेला शांतता पाळण्याचं आवाहन केलं आहे. या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, अज्ञात विटंबना करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना दिली.