बीड: ‘तुझा बाप कर्जबाजारी झाला’, सासरी असलेल्या मुलीला फोन करत शेतकऱ्याची आत्महत्या

मुंबई तक

बीड: ‘गिताजंली तुझा बाप कर्जबाजारी झाला आहे. घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने जीवन असहाय्य झाले आहे. शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करतो.’ असं सासरी असणाऱ्या मुलीला फोनवरुन सांगून एका 42 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील चिंचोटी गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जबाजारीपणाला कंटाळून 42 वर्षीय शेतकऱ्याने बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बीड: ‘गिताजंली तुझा बाप कर्जबाजारी झाला आहे. घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने जीवन असहाय्य झाले आहे. शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करतो.’ असं सासरी असणाऱ्या मुलीला फोनवरुन सांगून एका 42 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील चिंचोटी गावात घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जबाजारीपणाला कंटाळून 42 वर्षीय शेतकऱ्याने बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना बुधवार (15 डिसेंबर) पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेने चिंचोटी गावासह संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

बाळासाहेब लक्ष्मण गोंडे (वय 42 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून बीड जिल्ह्यातील चिंचोटी येथील ते रहिवाशी आहेत. त्याचं पिंपरखेड शिवारातील पांढरी येथे अंदाजे दीड एकर शेती आहे. मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास बाळासाहेब हे शेतात वस्तीवर गेले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp