केेंद्र सरकारची Social Media आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी नवी नियमावली

मुंबई तक

भारत सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नव्या गाईडलाईन्स लागू केल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले सोशल मीडिया कंपन्यांचे आम्ही भारतात स्वागत करतो. सोशल मीडियावरच्या चुकीच्या गोष्टींविरुध्द दाद मागण्यासाठी एक मंचाची आवश्यकता आहे. सोशल मीडियासाठी नवीन गाईडलाईन्स पुढच्या 3 महिन्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारत सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नव्या गाईडलाईन्स लागू केल्या आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले सोशल मीडिया कंपन्यांचे आम्ही भारतात स्वागत करतो. सोशल मीडियावरच्या चुकीच्या गोष्टींविरुध्द दाद मागण्यासाठी एक मंचाची आवश्यकता आहे. सोशल मीडियासाठी नवीन गाईडलाईन्स पुढच्या 3 महिन्यात लागू केल्या जाणार आहेत. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फेक न्यूजचा प्रसार केला जातो त्याला आळा घालण्यासाठी या गाईडलाईन्स उपयुक्त ठरणार आहेत.

ऱविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात 53 कोटी व्हॉट्स अँप युझर्स, 40 कोटी फेसबुक युझर्स तर 1.7 कोटी ट्विटर युझर्स आहेत. सुप्रीम कोर्टाने 2019 मध्ये नवीन गाईडलाईन्सच तयार करा अशी सूचना केंद्राला केली होती त्यानुसार या गाईडलाईन्स तयार कऱण्यात आल्या आहेत.

नवीन गाईडलाईन्सनुसार सोशल मीडियावर सोशल आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यास मनाई असणार आहे तसेच सोशल मिडीयाच्या मजकूराची तीन स्तरात तपासणी होणार. महिलांविरोधातली आक्षेपार्ह पोस्ट 24 तासात हटवावी लागणार आणि संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास किमान 5 वर्षाची शिक्षा होणार अशा तरतुदी या गाईडलाईन्समध्ये आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp