भारताने गव्हाची निर्यात रोखली! केंद्राने का घेतला इतका मोठा निर्णय?

मुंबई तक

गव्हाची निर्यात रोखण्याचा निर्णय केंद्र सरकारने तातडीने घेतला आहे. त्यामुळे गव्हाचा समावेश प्रतिबंधित वस्तूंच्या आणि मालाच्या यादीत झाला आहे. परदेश व्यापार महानिर्देशालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. महागणाऱ्या वस्तूंच्या यादीत आटाही (गव्हाचे पीठ) मागे राहिला नाही. देशात पेट्रोल-डिझेलसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही प्रचंड महागल्या आहेत. गव्हाच्या पिठाचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे वाढत्या किंमती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

गव्हाची निर्यात रोखण्याचा निर्णय केंद्र सरकारने तातडीने घेतला आहे. त्यामुळे गव्हाचा समावेश प्रतिबंधित वस्तूंच्या आणि मालाच्या यादीत झाला आहे. परदेश व्यापार महानिर्देशालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

महागणाऱ्या वस्तूंच्या यादीत आटाही (गव्हाचे पीठ) मागे राहिला नाही. देशात पेट्रोल-डिझेलसह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही प्रचंड महागल्या आहेत. गव्हाच्या पिठाचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. त्यामुळे वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने तातडीने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

भारतात गव्हाच्या किंमती ऐतहासिक पातळीवर गेल्या आहेत. आट्याचे भाव तब्बल ९.१५ टक्क्यांनी वाढून प्रति किलो ३२.७८ वर पोहोचले आहेत. त्यामुळे रेस्तराँमधील चपातीच्या किंमतीही वाढल्या आहेत. गव्हाच्या पिठाच्या वाढलेले दर नियंत्रणात आणण्यासाठी आता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

डीजीएफटीने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटलेलं आहे की, अधिसूचनेची तारीख वा त्यापूर्वी ज्या निर्यातीस सरकारने परवानगी दिलेली आहे. त्याची निर्यात केली जाईल. या अधिसूचनेत सरकारने आणखी एक बाब स्पष्ट केलेली आहे की, इतर देशांतील धान्य पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी तेथील सरकारांच्या विनंतीवरून निर्यातीस परवानगी दिली जाईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp