खासदार संभाजीराजेंचं आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलन, 5 हजार तरूण मुंबईला रवाना
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारने दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे भोसलेंनी आजपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातल्या विविध भागांमधून पाच हजार तरूण मुंबईत रवाना झाले आहेत. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार संभाजीराजे करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ५ हजार मराठा तरुण मुंबईला रवाना झाले आहेत. […]
ADVERTISEMENT

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारने दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे भोसलेंनी आजपासून आझाद मैदानावर अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातल्या विविध भागांमधून पाच हजार तरूण मुंबईत रवाना झाले आहेत.
मराठा समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार संभाजीराजे करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ५ हजार मराठा तरुण मुंबईला रवाना झाले आहेत. ज्यात औरंगाबादचे १ हजार तरुणांचा समावेश आहे.
आज पुन्हा त्याच आझाद मैदानात मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या आंमलबजावणीसाठी युवराज संभाजीराजे आमरण उपोषणाला बसत आहेत…#आझाद_मैदान#आमरण_उपोषण
(२/२)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 26, 2022
काय म्हणाले होते संभाजीराजे?
मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. मात्र सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार ते आजपासून उपोषण आंदोलन सुरू करत आहेत.