नेपाळ दुर्घटना: ठाण्यातील जोडपं विखुरलेला संसार सावरायला गेले, अन्…

मुंबई तक

विक्रांत चौहान, ठाणे: नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जाणाऱ्या प्रवासी विमानाचा काल (29 मे) अपघात झाला होता. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 22 लोक होते. ज्यामध्ये ठाण्यातील चार जणांचाही समावेश होता. या अपघाताला 24 तासांहून अधिकचा वेळ उलटून गेलेला आहे. मात्र, या चारही जणांचा अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या सगळ्यात ठाण्यातील चौघांबाबत एक नवी माहिती समोर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

विक्रांत चौहान, ठाणे: नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जाणाऱ्या प्रवासी विमानाचा काल (29 मे) अपघात झाला होता. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 22 लोक होते. ज्यामध्ये ठाण्यातील चार जणांचाही समावेश होता. या अपघाताला 24 तासांहून अधिकचा वेळ उलटून गेलेला आहे. मात्र, या चारही जणांचा अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. या सगळ्यात ठाण्यातील चौघांबाबत एक नवी माहिती समोर आली आहे.

त्रिपाठी दाम्पत्य गेलेले सावरायला पण…

ठाण्यातील माजिवडा येथे राहणारे त्रिपाठी कुटुंबीयपैकी त्यांची पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी पती अशोक त्रिपाठी तसेच त्यांचा मुलगा धनुष्य अणि रितीका अणि असे चौघेही नेपाळच्या टूरवर गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपाठी दाम्पत्य हे वेगळे राहत आहेत. त्यांनी घटस्फोटासाठी अर्जही केला होता. पण विभक्त होण्यापूर्वी न्यायालयाने त्यांना 10 दिवस एकत्र फिरण्याची मुभा दिली होती. कोर्टाने मुभा दिल्याने त्रिपाठी दाम्पत्य हे आपल्या दोन्ही मुलांसह नेपाळला फिरण्यास गेले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp