Omicron: …तर पुन्हा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो: आरोग्य राज्यमंत्री भारती पवार
स्वाती चिखलीकर, सांगली: ‘ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशातील कोरोनाचे संकट गहिरं झालं आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत अधिक वाढ झाल्यास संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो.’ असा इशाराच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला आहे. सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. […]
ADVERTISEMENT

स्वाती चिखलीकर, सांगली: ‘ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे देशातील कोरोनाचे संकट गहिरं झालं आहे. पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत अधिक वाढ झाल्यास संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो.’ असा इशाराच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला आहे. सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
‘गरज पडल्यास लॉकडाऊनचा निर्णय’
‘ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन राज्य शासनांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. गरज पडल्यास कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग डेल्टा व्हेरिएंटपेक्षा झपाट्याने होत असल्याचं दिसून आलं आहे. पणं असं असलं तरी तो बरा देखील लवकर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, तरीही नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.’ असं भारती पवार म्हणाल्या.
‘केंद्र सरकारने राज्य सरकारांना दोन पॅकेजमधून विशेष मदत केली आहे. पॅकेजचा निधी देखील वितरित करण्यात आला आहे. यामधून राज्यांना आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, औषध खरेदी करता येतील.’ अस सांगून पवार पुढे म्हणाल्या, ‘लॉकडाऊनचा निर्णय हा सर्वस्वी राज्य सरकारचा आहे. कंटेन्मेंट झोन करणे, कडक नियम लावणे हे सर्व काम राज्य सरकारनी करायचे आहे. रुग्णसंख्या वाढल्याने गरज पडल्यास लॉकडाऊनचा निर्णय हा राज्य सरकारने घ्यायचा आहे.’ असंही त्या म्हणाल्या.