नुसती माफी काय कामाची? मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पीएम केअर्सच्या बेहिशेबी फंडातून मदत करा-संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. मात्र नुसती माफी काय कामाची? पीएम केअर्स फंडातून आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मागणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तुमच्या चुकीमुळे 700 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबाना नुकसान भोगावं लागतं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. काय म्हणाले आहेत संजय […]
ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेताना शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. मात्र नुसती माफी काय कामाची? पीएम केअर्स फंडातून आर्थिक मदत दिली पाहिजे अशी मागणी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तुमच्या चुकीमुळे 700 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबाना नुकसान भोगावं लागतं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत संजय राऊत?
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात रस्त्यापासून संसदेत आंदोलन झालं. सरकार ऐकायला तयार नव्हतं. मात्र शेतकऱ्यांनी एकजूट केली, या एकजुटीपुढे सरकार नमलं. या आंदोलनात शेतकरी मृत्यू झाले. ७०० हून अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला. आता केंद्र सरकारने या कुटुंबाना मदत व्हावी अशी मागणी होत असेल त्यात गैर काय? पीएम केअर फंडात बेहिशेबी पैसे पडले आहेत. त्यातून या मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली गेली पाहिजे. देशाची आणि शेतकऱ्यांची नुसती माफी मागून चालणार नाही. तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा या कुटुंबाना भोगावी लागते आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.