Sanjay Raut: ‘देशभरातील दंगली या भाजप प्रायोजित आहेत’, राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई तक

मुंबई: देशातील प्रमुख शहरांमध्ये ज्या काही दंगली सुरु आहेत त्या भाजप प्रायोजित आहे. भाजपनेच अनेक ठिकाणी देशात दंगलीची परिस्थिती निर्माण केली आहे. असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. पाहा संजय राऊ नेमकं काय म्हणाले: ‘देशभरात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: देशातील प्रमुख शहरांमध्ये ज्या काही दंगली सुरु आहेत त्या भाजप प्रायोजित आहे. भाजपनेच अनेक ठिकाणी देशात दंगलीची परिस्थिती निर्माण केली आहे. असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

पाहा संजय राऊ नेमकं काय म्हणाले:

‘देशभरात ज्या दंगली सुरु आहेत ते सत्ताधारी जो पक्ष आहे देशातील त्यांनी प्रायोजित केलेल्या या दंगली आहेत हे स्पष्टपणे दिसतं आहे. याआधी कधी रामनवमी किंवा हनुमान जयंतीला दंगली झाल्या नाहीत. लोकांनी हे सण शांतपणे साजरे केलेले आहेत.’

‘दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. तिकडची कायदा-सुव्यवस्था ही केंद्राच्या हातात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तिकडे दंगली सुरु आहेत. तिकडच्या महानगर पालिकांच्या निवडणुकांवर भाजपचं लक्ष आहे.’

हे वाचलं का?

    follow whatsapp