मुंबईत भाजपला पडणार खिंडार?; शिवसेना नेत्याने केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

मुंबईत महापालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेबरोबर इतर राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपापले पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीआधीच मुंबई भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे 15-20 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असून, डिसेंबरनंतर प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी हा दावा केला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईत महापालिका निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेबरोबर इतर राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपापले पक्ष मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीआधीच मुंबई भाजपला मोठे खिंडार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे 15-20 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असून, डिसेंबरनंतर प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी हा दावा केला आहे.

राजकीय पक्षांना इतर महापालिकांबरोबरच मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध लागले असून, भाजप राजकीय भूकंप होण्याचे संकेत आहेत. याबद्दल शिवसेनेचे नेते आणि महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मोठं विधान केलं आहे.

भाजपचे 15-20 नगरसेवक पक्षा नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp