फडणवीसांच्या वक्तव्यानंतर वारिशेंची हत्या, योगायोग समजावा का?: राऊत

मुंबई तक

Sanjay Rauts letter: मुंबई: नाणार रिफायनरीविरुद्ध (Nanar Refinery) बातमी देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे (shashikant warishe) यांच्या हत्या प्रकरणाने पूर्णपणे वेगळं वळण घेतलं आहे. रिफायनरीविरुद्ध बातमी दिल्यानेच वारिशे यांची हत्या केल्याचा आरोप वारिशेंचे कुटुंबीय आणि आता विरोधक करु लागले आहेत. या सगळ्यात शिवसेना (UBT) (Shivsena) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sanjay Rauts letter: मुंबई: नाणार रिफायनरीविरुद्ध (Nanar Refinery) बातमी देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारिशे (shashikant warishe) यांच्या हत्या प्रकरणाने पूर्णपणे वेगळं वळण घेतलं आहे. रिफायनरीविरुद्ध बातमी दिल्यानेच वारिशे यांची हत्या केल्याचा आरोप वारिशेंचे कुटुंबीय आणि आता विरोधक करु लागले आहेत. या सगळ्यात शिवसेना (UBT) (Shivsena) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पत्र लिहत त्यांच्यावरच एक प्रकारे आरोप केले आहेत. (after fadnavis statement should killing of shashikant warishe be considered a coincidence sanjay rauts letter stirs up excitement)

‘4 फेब्रुवारी 2023 रोजी कोकणातील आंगणेवाडी जत्रेत भारतीय जनता पक्षाची एक जाहीर सभा झाली. त्या सभेत आपण ठासून सांगितले की, नाणार येथे रिफायनरी होणारच. कोण अडवतेय ते पाहू व आपल्या वक्तव्यास चोवीस तास उलटत नाही तोच दुसऱ्या दिवशी शशिकांत वारिशे यांची हत्या झाली. हा फक्त योगायोग समजावा का?’ असा सवाल राऊतांनी यावेळी केला आहे.

आता राऊतांच्या या पत्राचा रोख नेमका कोणाकडे आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

Crime : सकाळी बातमी आली, दुपारी गाडीने उडवलं; हा पत्रकाराचा खूनच! कोणी केला आरोप?

हे वाचलं का?

    follow whatsapp