Speaker of the Assembly: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार? शिवसेनेचा आमदारांना थेट आदेश!
मुंबई: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly rainy session) यंदा अवघ्या दोनच दिवसांचं असणार आहे. पण या दोन दिवसाच्या अधिवेशनात बरंच काही घडण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षणापासून ओबीसी आरक्षणापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरुन विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे हे अधिवेशन जरी दोनच दिवसांचं असलं तरीही यामध्ये बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly rainy session) यंदा अवघ्या दोनच दिवसांचं असणार आहे. पण या दोन दिवसाच्या अधिवेशनात बरंच काही घडण्याची शक्यता आहे. कारण मराठा आरक्षणापासून ओबीसी आरक्षणापर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरुन विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे हे अधिवेशन जरी दोनच दिवसांचं असलं तरीही यामध्ये बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
मात्र, या सगळ्यात सर्वांचं लक्ष हे एकाच गोष्टीवर असणार आहे. ते म्हणजे विधानसभेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे. (assembly speaker election)
दरम्यान, या दोन दिवसाच्या अधिवशेनात विधानसभा अध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचा अंदाज हा शिवसेनेने आपल्या आमदारांना दिलेल्या एका आदेशावरुन वर्तवला जात आहे. हा आदेश नेमका काय आहे आणि तो कोणी जारी केलाय हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी आपण हे समजून घेऊयात की, विधानसभा अध्यक्ष पदाची पुन्हा निवडणूक का घ्यावी लागणार आहे ते.
विधानसभा 2019 निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं. तेव्हा विधानसभा अध्यक्ष हे अत्यंत महत्त्वाचं पद हे काँग्रेसच्या वाट्याला गेलं. त्या पदावर नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण साधारण चार महिन्यांपूर्वीच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे.