Jalgaon: प्रेमी युगुलाची शाळेच्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनीष जोग, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील वाडे येथे एका प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. ३१ जुलै) मध्यरात्रीनंतर घडली असून, ती आज (रविवारी) सकाळी उजेडात आली.

मुकेश कैलास सोनवणे (वय 22) आणि नेहा बापू ठाकरे (वय 19) अशी मृतांची नावे असून दोघेही वाडे गावातील रहिवासी होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाडे गावातील माध्यमिक विद्यालयाच्या नवीन इमारतीतील वरच्या मजल्यावर जिन्यात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन मुकेश व नेहा या प्रेमी युगुलाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. ही घटना रविवारी सकाळी उजेडात आली. त्यानंतर गावचे पोलीस पाटील अरविंद पाटील यांनी भडगाव पोलिसांना घटनेची माहिती कळवली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह तत्काळ वाडे गावात दाखल झाले.

ADVERTISEMENT

त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवले. याप्रकरणी पोलीस पाटील अरविंद पाटील यांच्या माहितीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

प्रेम प्रकरणातून घटना घडल्याचा संशय

ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याचा पोलिसांना संशय आहे. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुकेश व नेहा हे एकाच समाजाचे असून दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, समाजाकडून प्रेमाला मान्यता मिळणार नाही. या भीतीपोटी दोघांनी टोकाचे पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळी संशयास्पद पुरावे नाहीत

दरम्यान, या घटनेबाबत माहिती देताना तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी सांगितले की, मुकेश व नेहा या प्रेमी युगुलाने शाळेच्या इमारतीत जिन्यात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या घटनेच्या प्राथमिक तपासात तसे स्पष्ट होत आहे. आम्हाला घटनास्थळी संशयास्पद पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे दोघांनी प्रेमप्रकरणातूनच आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.

तरीही पोलीस या घटनेचा सर्व बाजूने तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी प्रेमी युगुलाने व्हॉट्सअॅपवर काही स्टेटस वैगरे ठेवले होते किंवा नाही याबाबत माहिती देखील घेतली जात आहे.

तपासकामी त्यांचे मोबाइल ताब्यात घेतले जातील, त्यात ते समोर येईलच. शिवाय त्यांनी कोणाशी संपर्क केला होता, यासारख्या काही बाबी स्पष्ट होतील असेही तपासाधिकारी सोनवणे यांनी सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT