विधानपरिषद निवडणूक: भाजपची सारी भिस्त आयारामांवर, तीन उमेदवार तर मूळचे काँग्रेसी!

मुंबई तक

मुंबई: विधानसभेला तिकीट कापल्यानंतर आता भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. एकप्रकारे जुन्या कार्यकर्त्याचं पुनर्वसन केलं आहे. पक्षाकडून ओबीसी चेहरा देण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपचे पाचपैकी तीन उमेदवार हे मूळचे काँग्रेसी विचाराचे आहेत. त्यामुळेच भाजपची सारी भिस्त ही आयारामांवर आहे, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, ही निवडणूक नेमकी का होतेय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: विधानसभेला तिकीट कापल्यानंतर आता भाजपने माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. एकप्रकारे जुन्या कार्यकर्त्याचं पुनर्वसन केलं आहे. पक्षाकडून ओबीसी चेहरा देण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपचे पाचपैकी तीन उमेदवार हे मूळचे काँग्रेसी विचाराचे आहेत. त्यामुळेच भाजपची सारी भिस्त ही आयारामांवर आहे, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, ही निवडणूक नेमकी का होतेय आणि भाजपच्या उमेदवार यादीचं वैशिष्ट्य काय? जाणून घेऊयात याबाबत सविस्तरपणे.

विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. यावेळी 6 जागांवर होणाऱ्या या निवडणुकीसाठी 14 डिसेंबरला मतदान आहे. या सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या आहेत.

निवडणूक सहा जागांवर होत असली, तरी भाजपने मात्र पाच जागांवरच उमेदवार दिले आहेत. निवडून येण्याची प्रबळ शक्यता असलेल्या जागांवरच भाजपने नशीब आजमावण्याचा निर्णय घेतल्याचं या यादीवरून दिसतं आहे. मुंबईतल्या दोनपैकी एका जागेवर भाजपने उमेदवार दिला आहे. या यादीमध्ये

मुंबईतून राजहंस सिंह, कोल्हापुरातून अमल महाडिक, धुळे-नंदूरबारमधून अमरीश पटेल, नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे आणि अकोला-बुलडाणा वाशिम या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मतदारसंघातून वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp