महाराष्ट्र निर्बंधमुक्त! नव्या आर्थिक वर्षात काय काय नियम बदलले? जाणून घ्या..

मुंबई तक

महाराष्ट्र आणि देश कोरोनाच्या निर्बंधातून पूर्णपणे मुक्त झाला आहे. मास्कची सक्ती सोडली तर आता देशात आणि राज्यात कोणतेही निर्बंध नाहीत. अशात आजपासून नव्या आर्थिक वर्षालाही सुरूवात झाली आहे. नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल झाले आहेत. अनेक नियम बदलले आहेत. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर त्याचा परिणाम हा होणार आहे. आपण जाणून घेऊ की नेमके काय काय बदल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

महाराष्ट्र आणि देश कोरोनाच्या निर्बंधातून पूर्णपणे मुक्त झाला आहे. मास्कची सक्ती सोडली तर आता देशात आणि राज्यात कोणतेही निर्बंध नाहीत. अशात आजपासून नव्या आर्थिक वर्षालाही सुरूवात झाली आहे. नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल झाले आहेत. अनेक नियम बदलले आहेत. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर त्याचा परिणाम हा होणार आहे. आपण जाणून घेऊ की नेमके काय काय बदल झाले आहेत?

आजपासून महाराष्ट्रातले कोरोनाचे सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे कोरोनाशी हात करण्यासाठी लावण्यात आलेले दोन वर्षांचे निर्बंध आता संपुष्टात आले आहेत. गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरूवात २ एप्रिलपासून (शनिवार) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनेही जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

१ एप्रिलपासून कोरोनाच्या सर्व निर्बंधातून राज्य मुक्त, मार्च २०२० ते मार्च २०२२ या काळात असलेले सगळे निर्बंध अखेर संपुष्टात

गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद दोन वर्षांपूर्वीच्या उत्साहाने साजरी करण्यास कोणतीही आडकाठी नाही

हे वाचलं का?