Uddhav Thackeray: माझ्या माणसांनीच मला दगा दिला,काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांचे आभार

मुंबई तक

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरेंनी मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस कॅबिनेट बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली होती. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले तसंच माझ्याच लोकांनी मला दगा दिला असं यावेळी उद्धव ठाकरे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरेंनी मंगळवार आणि बुधवार या दोन दिवस कॅबिनेट बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली होती. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांचे आभार मानले तसंच माझ्याच लोकांनी मला दगा दिला असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय भूकंपानंतर दोनदा राजीनामा देणार होते पण पवारांनी थांबवलं

ज्या मंत्र्यांच्या खात्यांचे विषय राहिले आहेत ते आपण पुढच्या कॅबिनेटमध्ये घेऊ. तसंच कुणी दुखावलं असेल तर मला माफ करा, अडीच वर्षे जे सहकार्य केलं त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यात जी परिस्थिती आत्ता निर्माण झाली आहे ती माझ्याच लोकांनी मला दगा दिल्याने निर्माण झाली आहे असंही वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

फ्लोअर टेस्टवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष; महाराष्ट्राच्या लढ्यात पुढे काय?

हे वाचलं का?