मलिकांच्या कुटुंबाची उस्मानाबादेत १५० एकर जमीन, खरेदी करताना घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप
– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकाकडून मालमत्ता खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आलेल्या नवाब मलिकांच्या अडचणी कमी होत नाहीयेत. मलिकांना विशेष कोर्टाने ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालेला आहे. अशातच मलिक यांच्या कुटुंबाच्या नावावर उस्मानाबाद जिल्ह्यात १५० एकर जमीन असून ही जमीन खरेदी करताना व मुल्यांकनादरम्यान घोटाळा […]
ADVERTISEMENT
![मलिकांच्या कुटुंबाची उस्मानाबादेत १५० एकर जमीन, खरेदी करताना घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप Mumbaitak](https://akm-img-a-in.tosshub.com/lingo/mumbaitak/images/story/202301/nawab1-1024x576.png?size=948:533)
– गणेश जाधव, उस्मानाबाद प्रतिनिधी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या हस्तकाकडून मालमत्ता खरेदी प्रकरणात ईडीच्या रडारवर आलेल्या नवाब मलिकांच्या अडचणी कमी होत नाहीयेत. मलिकांना विशेष कोर्टाने ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झालेला आहे. अशातच मलिक यांच्या कुटुंबाच्या नावावर उस्मानाबाद जिल्ह्यात १५० एकर जमीन असून ही जमीन खरेदी करताना व मुल्यांकनादरम्यान घोटाळा झाल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांनी केला आहे.
इतकी जमीन खरेदी करण्यासाठी मलिकांकडे पैसा कुठून आला याचा तपासही ईडीने करावा अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मलिक यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या नावावर ही जमीन असून गेल्या ८ वर्षांपासून ही जमीन पडीक असल्याचं कळतंय. उस्मामाबाद सारख्या ग्रामीण भागात तब्बल १५० एकर जमीन घेण्याचे प्रयोजन काय? यासह जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून खरेदी खत केले व सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला. शेतकरी नसताना मलिक कुटुंबाने जमीन खरेदी केली अशा अनेक बाबी संशयस्पद असून इडीने याची चौकशी करावी अशी मागणी भाजपने केली आहे.
केंद्रीय मंत्र्यांना जेवताना अटक, कोणत्या तोंडाने म्हणता आकसाने कारवाई झाली? – विनायक मेटे
ADVERTISEMENT
नवाब यांची पत्नी मेहजबीन नवाब मलिक, मुलगी सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान , फराज नवाब मलिक व बुश्रा फराज यांच्या नावाने जमीन खरेदी २० डिसेंबर २०१३ रोजी केली आहे. सदरहू जमीन बागायती असताना जिरायत जमीन दाखवून तिचं मूल्यांकन १ कोटी २० लाखांनी कमी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे सरकारचा महसूल बुडाला आहे. कागदोपत्री मलिकांनी ही जमीन २ कोटी ७ लाखांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे, मात्र प्रत्यक्षात जमीन खरेदी करताना जास्त रक्कम दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. या जमिनीवर शेततळे असून ती बागायत आहे. त्यातच या जमिनीवर आलिशान बंगला असताना त्याचे मूल्यांकन खरेदी करताना दाखविले गेले नाही त्यामुळे सरकारचा महसूल बुडाल्याचंही भाजपचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
दाऊद, शकील, सलीम फ्रूट… नवाब मलिकांच्या केसमध्ये अंडरवर्ल्डची एंट्री; काय आहे नेमकं प्रकरण?
मलिक यांची ही जमीन पडीक असून या जमिनीच्या राखणीसाठी लखनऊ शहरातील एका वॉचमनला नियुक्त करण्यात आलं आहे. या जमिनीच्या खरेदीसाठी वापरण्यात आलेला पैसे बेनामी असल्याचंही भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे याप्रकरणात पुढे नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Exclusive Inside Story: नवाब मलिकांच्या अटकेवर काय होती CM ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, ‘त्या’ बैठकीत काय ठरलं?
ADVERTISEMENT