हिवाळी अधिवेशनात मोठ्या नेत्यांची नावं जाहीर करणार; नवाब मलिकांच्या माहितीने खळबळ

मुंबई तक

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करतानाच काही नेत्यांचे ड्रग्ज प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. त्या नेत्यांची नाव जाहीर करणार असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले, ‘महिनभरात जी परिस्थिती होती. तशी आता राहिली नाही. परिस्थिती बदलल्यानंतर कालपासून भाजपचे नेते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करतानाच काही नेत्यांचे ड्रग्ज प्रकरणाशी कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. त्या नेत्यांची नाव जाहीर करणार असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले, ‘महिनभरात जी परिस्थिती होती. तशी आता राहिली नाही. परिस्थिती बदलल्यानंतर कालपासून भाजपचे नेते आणि त्यांचे राईट हॅण्ड समीर वानखेडेंना एनसीबी कार्यालयात भेटत आहेत. कासिफ खानला अटक झाल्यावर अनेकांची पोलखोल होईल आणि त्याच्याकडे किती लोकांचे पैसे आहे, हे उघड होईल’, अशी माहिती मलिकांनी दिली.

हे षडयंत्र… योगी आदित्यनाथांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

यामागे भाजप आहे का असा प्रश्न मलिकांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना मलिक म्हणाले, ‘माझ्याकडे काही हत्यारं राहुद्या. विधानसभा वादळी ठरणार आहे. आता बोलल्यानंतर काही लोक न्यायालयात जातील. विधानसभेत माझ्यावर जे काही आरोप होणार आहेत. त्याचं उत्तर देताना मी जे काही समोर आणेल, त्यानंतर राज्यातील काही नेत्यांना तोंड दाखवणं कठीण होऊन जाईल’, असा इशारा मलिकांनी दिला.

‘या ड्रग्ज प्रकरणात बऱ्याच लोकांचं कनेक्शन आहे. ते पुरावे मी गोळा करतोय. नेत्यांच्या बाबतीत आज मी नाव घेत नाही. ७ डिसेंबपासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. त्यात भाजपच्या वतीने माझ्यावर हल्ले होणार आहेत. पण मी कोणत्याही नेत्याचं नाव घेऊन विषय डायव्हर्ट करणार नाही. हिवाळी अधिवेशनात मी मोठमोठे नावे जाहीर करणार आहे’, असा दावा मलिकांनी केला आहे.

पोपट पिंजऱ्यात बंद होणार असल्यानंच भाजपवाले घाबरलेत -नवाब मलिक

‘होय, मी भंगारवाला आहे’

‘मी काही लोकांची पोलखोल केली आहे. त्यामुळे मला डिवचले जात आहे. होय, माझे वडील भंगारवाला होते. मी भंगारवाला आहे. पण मी कुठलीही बँक बुडवली नाही. सोन्याची तस्करी केली नाही. कुणालाही फसवलं नाही. माझ्या घरी कधीही सीबीआयची रेड पडली नाही. भंगारवाला भंगार गोळा करून त्यांचं पाणी करतो. मी आता भंगार असलेल्या गोष्टी गोळा करून त्यांचं पाणी करणार आहे,’ अशा शब्दात मलिक यांनी सुनावलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp