समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; अटक करायची असल्यास…

मुंबई तक

मुंबई पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी समीर वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात चार ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानंतर मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आदेश काढत चार जणांचं पथक या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. या घडामोडी घडल्यानंतर समीर वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी समीर वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे. समीर वानखेडे यांच्या विरोधात चार ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानंतर मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आदेश काढत चार जणांचं पथक या प्रकरणी चौकशी करणार असल्याचं म्हटलं आहे. या घडामोडी घडल्यानंतर समीर वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

दरम्यान समीर वानखेडेंना यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. समीर वानखेडेंना अटक करण्याआधी तीन दिवस आधी सूचित करावं लागेल. असं कोर्टाने म्हटलं आहे त्यामुळे समीर वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.

समीर वानखेडेंनी के. पी. गोसावींच्या माध्यमातून शाहरुख खानकडे 25 कोटींची मागणी केली असा आरोप आहे. या प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार प्रभाकर साईल याने समोर येऊन आरोप केले आहेत. रविवारी प्रभाकर साईल समोर आला. त्याने काही सनसनाटी आरोप केले. त्यातला मुख्य आरोप हा होता की के. पी. गोसावीने शाहरुख खानकडे आर्यनला सोडण्याच्या बदल्यात 25 कोटी मागितले, त्यातले आठ कोटी समीर वानखेडेंना मिळणार होते. या आरोपानंतर एकच खळबळ माजली.

हे वाचलं का?

    follow whatsapp