महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही-शरद पवार

मुंबई तक

परमबीर सिंग यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी त्यांची भूमिका मांडली. यामध्ये त्यांनी केलेलं एक महत्व अत्यंत महत्त्वाचं आहे. ते हेच आहे की या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही असं वक्तव्य […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

परमबीर सिंग यांनी जे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. याबाबत आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी त्यांची भूमिका मांडली. यामध्ये त्यांनी केलेलं एक महत्व अत्यंत महत्त्वाचं आहे. ते हेच आहे की या सगळ्या घडामोडीमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर काही परिणाम होणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

पत्रातून परमबीर सिंग यांचे गंभीर आरोप, पण खाली सहीच नाही ! राज्य सरकार चौकशी करणार

परमबीर सिंग हे बदलीच्या आधी मला भेटले होते. मला त्यांनी माझ्यावर अन्याय होतो आहे हे स्पष्ट केलं होतं. माझ्या काही निर्णयांमध्ये राजकीय ढवळाढवळ होत होती असंही त्यांनी मला सांगितलं होतं मात्र अनिल देशमुख यांचं थेट नाव घेतलं नव्हतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्याबाबत एक ते दोन दिवसात निर्णय घेऊ असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांशी चर्चा घ्यावा.

परमबीर यांचे गंभीर आरोप, अनिल देशमुख अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार !

आणखी काय म्हणाले शरद पवार?

‘आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे फार गंभीर आहेत. पण परमबीर सिंग यांनी बदली झाल्यानंतरच हे आरोप केले आहेत. तसंच त्या पत्रावर त्यांची सही देखील नाही. आयुक्त असताना परमबीर यांनी असे कोणतेही आरोप केले नव्हते. अनिल देशमुखांबाबत नेमका निर्णय उद्यापर्यंत सर्वांशी चर्चा करुन घेतला जाईल. त्याआधी अनिल देशमुख यांचं म्हणणं देखील ऐकून घेऊ.’ शरद पवारांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे.

सचिन वाझेंना अटक, शरद पवार म्हणतात…

‘परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पत्रावर परमबीर सिंग यांची सही नाही. 100 कोटींच्या वसुलीचे आरोप देखील गंभीर आहेत. पण पत्रात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेले नाही की, हे पैसे कसे दिले आहेत. खरं तर परमबीर यांची मुंबईच्या आयुक्तपदावरुन बदली झाल्यानंतर त्यांनी हे आरोप केले आहेत. याआधी त्यांनी यासंबंधी आरोप का केले नाही किंवा पत्र का लिहलं नाही?’ असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp