Shakti Mills case: या पाच कारणांमुळे हायकोर्टाने आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली
2013 मध्ये झालेलं शक्ती मिल बलात्कार प्रकरण हे मुंबईला हादरवून टाकणारं प्रकरण ठरलं होतं. या प्रकरणी जे आरोपी होते त्याना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने या आरोपींना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 25 नोव्हेंबरला बॉम्बे हायकोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. आता फाशीची शिक्षा हायकोर्टाने जन्मठेपेत का बदलली ते आपण जाणून घेणार आहोत. शक्ती […]
ADVERTISEMENT

2013 मध्ये झालेलं शक्ती मिल बलात्कार प्रकरण हे मुंबईला हादरवून टाकणारं प्रकरण ठरलं होतं. या प्रकरणी जे आरोपी होते त्याना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने या आरोपींना आता जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 25 नोव्हेंबरला बॉम्बे हायकोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. आता फाशीची शिक्षा हायकोर्टाने जन्मठेपेत का बदलली ते आपण जाणून घेणार आहोत.
शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील तीन दोषींना फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलताना त्यांनी केलेल्या घृणास्पद कृत्यांबद्दल कोणतीही सवलत मिळण्यास पात्र नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले. या प्रकरणी बॉम्बे हायकोर्टाने 108 पानांचं सविस्तर निकालपत्र दिलं आहे.
कलम 376E ठोस गुन्हा नाही