शिवभोजन थाळी 14 जून 2021 पर्यंत मोफत!, म्हणजे लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री कार्यालयाने थोड्याच वेळापूर्वीच एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट केलं आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, 14 जून 2021 पर्यंत महाराष्ट्रात शिवभोजन थाळी ही मोफत मिळणार आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्याची साखळी तोडण्यासाठी साधारण एप्रिल महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशावेळी गरीबांचे हाल होऊ नये यासाठी ठाकरे सरकारने मोफत शिवभोजन थाळी सुरु केली आहे. त्याची मदत आता आणखी वाढविण्यात आली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: गरीबांसाठी शिवभोजन थाळी ही योजना सुरु केली होती. सुरुवातीला ही थाळी 10 रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान याची किंमत अवघी 5 रुपये करण्यात आली होती. दरम्यान, यंदाचा लॉकडाऊन जाहीर करताना गरीबांची ससेहोलपट होऊ नये यासाठी शिवभोजन थाळी ही मोफत देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. आता याच निर्णयात आणखी वाढ करण्यात आली.

मात्र, या निर्णयानंतर राज्यात मात्र एका वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. राज्यात लावण्यात आलेला लॉकडाऊन लवकरात लवकर हटविण्यात यावा आणि सारं काही पुन्हा एकदा सुरळीत व्हावं अशीच सर्वांची इच्छा आहे. मात्र, असं असलं तरीही ज्या अर्थी शिवभोजन थाळी आणखी १५ दिवस मोफत देण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ते लक्षात घेता लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज्य सरकारने शिवभोजन थाळी ही 14 जूनपर्यंत मोफत देण्याचा निर्णय घेतल्याने आता सरकार लॉकडाऊन देखील 14 जूनपर्यंत वाढवणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी 14 एप्रिलपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झाला. तो आधी 1 मेपर्यंत होता. त्यानंतर तो 15 मे आणि नंतर 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला. अशात आता 1 जूनच्या पुढेही महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता वाटत आहे.

महाराष्ट्रात 1 जूननंतरही Lockdown कायम राहणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर

ADVERTISEMENT

पाहा अजित पवार काय म्हणाले लॉकडाऊनबाबत:

ADVERTISEMENT

‘आज 21 मे आहे, 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत आपण लॉकडाऊन कायम ठेवला आहे. लॉकडाऊन केल्याचे चांगले परिणाम पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दिसून आले आहेत. त्यामुळे पुढे काय करायचं याचा निर्णय अद्याप झालेला नाही. योग्य वेळी त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. आणखी दहा दिवस आपल्या हातात आहेत. त्यानंतर काय निर्णय करायचा ते पाहू.’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पुण्यात झालेल्या कोरोना आढावा बैठकीसाठी ते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

शिवभोजन थाळी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध:

शिवभोजन थाळी ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध आहे. एवढंच नव्हे तर कोणत्या हॉटेलमध्ये एका वेळेस किती थाळी उपलब्ध असतील याची देखील माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

Shiv Bhojan Thali: महाराष्ट्रात मोफत शिवभोजन थाळी कुठे-कुठे मिळणार?, हॉटेलचं नाव, पत्ता सगळं काही एका क्लिकवर

1 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम, काय आहेत महत्त्वाचे नियम

काय आहेत नवे नियम?

ठाकरे सरकारने 1 जूनपर्यंत लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले आहेत बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांना RTPCR टेस्ट बंधनकारक असणार आहे.

महाराष्ट्रात प्रवेश करताना RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह नसेल तर प्रवेश दिला जाणार नाही, प्रवेश घेण्याच्या 48 तास आधी हा रिपोर्ट असणं आवश्यक आहे

देशातल्या कोणत्याही भागातून येणाऱ्या लोकांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

लग्न समारंभ

लग्न समारंभासाठी आता हॉलमध्ये फक्त दोन तासांसाठी जास्तीत जास्त 25 लोकांना उपस्थित राहता येईल. जर एकाही कुटुंबाने लग्न समारंभाचा हा नियम मोडला तर त्यांच्याकडून 50 हजारांचा दंड वसूल केला जाईल. लग्न समारंभाला हजर राहतानाही कोव्हिड 19 प्रतिबंधाचे सगळे नियम पाळणं आवश्यक.

आता घरच्या घरीच करता येणार कोरोना चाचणी, ICMR ची होम बेस्ड कोव्हिड टेस्टिंग किटला मंजुरी

राज्यात लॉकडाऊन लावण्यात आल्यापासून 10 ते 15 जिल्ह्यांमधली कोरोना रूग्णांची संख्या घटली आहे. मात्र अजूनही संख्या पूर्णतः नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे सध्याचे निर्बंध आणखी पंधरा दिवसांनी वाढविण्यात आले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT