Indira Gandhi : पक्षातून हकालपट्टी झाली, चिन्ह गेलं; तरीही उधळला होता विजयाचा गुलाल

भाग्यश्री राऊत

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षावर दावा ठोकला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? ते एकनाथ शिंदेंना मिळाले तर ठाकरेंचं काय होणार? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण, यापूर्वीही देशातील एका ज्येष्ठ नेत्यांना पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळालं नव्हतं. तरीही त्यांचा निवडणुकीत दणदणीत विजय झाला होता. या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विधीमंडळ पक्षावर दावा ठोकला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार? ते एकनाथ शिंदेंना मिळाले तर ठाकरेंचं काय होणार? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण, यापूर्वीही देशातील एका ज्येष्ठ नेत्यांना पक्षाचं निवडणूक चिन्ह मिळालं नव्हतं. तरीही त्यांचा निवडणुकीत दणदणीत विजय झाला होता. या नेत्या कोण होत्या? आणि ही घटना नेमकी काय होती? हेच जाणून घेऊयात.

इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी –

सालं होतं १९६९, त्या नेत्या होत्या देशाची आयर्न लेडी इंदिरा गांधी. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. तरी पक्षावर काँग्रेसच्या काही वयोवृद्ध नेत्यांचं वर्चस्व कायम होतं. यामध्ये दक्षिणेतील काही नेते आणि मोरारजी देसाई यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता. त्यालाच काँग्रेस सिंडीकेट म्हटलं जात होतं. या सिंडीकेटचा आपल्या दैनंदिन कामात हस्तक्षेप होऊ नये, असं इंदिरा गांधींना नेहमी वाटायचं. पण, त्यांना बाजूला कसं करायचं याचं नियोजन त्या आखत होत्या.

इतक्यात भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसैन यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच मृत्यू झाला. व्ही. व्ही. गिरी यांना राष्ट्रपती बनवण्याची इंदारीजींची इच्छा होती. पण, सिंडीकेट निलम संजीव रेड्डी यांच्या नावावर ठाम होतं. काँग्रेसकडून निलम संजीव रेड्डी हेच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार होते. पण, इंदिरा गांधींनी बंड केलं आणि लोकसभेतील काँग्रेसच्या संसदीय नेत्या या नात्यानं काँग्रेस सदस्यांना व्हीप जारी करण्यास नकार दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp