सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार का? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली तीन कारणं
आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. मात्र ज्या काही घटना गेले चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय त्या पाहिल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवली आहे असं आम्हाला वाटत नाही. कुणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं असेल तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा अशी आमची मानसिकता झाल्याने आम्ही बैठकीवर बहिष्कार घातला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया […]
ADVERTISEMENT

आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. मात्र ज्या काही घटना गेले चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय त्या पाहिल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवली आहे असं आम्हाला वाटत नाही. कुणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं असेल तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा अशी आमची मानसिकता झाल्याने आम्ही बैठकीवर बहिष्कार घातला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
रामदेव बाबाच्या शिबिरात भेट अन्…; नवनीत राणा आणि रवी राणांच्या लव्हस्टोरीचा किस्सा
विरोधी पक्षाला जिवानिशी संपवायचं ही जर एक सरकारची प्रवृत्ती असेल आणि सरकारी पक्षातले लोक विऱोधकांवर पोलिसांच्या समोर हल्ले करणार असतील आणि त्यानंतरही FIR नोंदवायला संघर्ष करावा लागत असेल तर अशा परिस्थितीत अशा बैठकीला जाऊन फायदा काय? अशी परिस्थिती आजवर महाराष्ट्रात आम्ही कधीही पाहिली नाही. सरकारतर्फे पोलीस संरक्षणाच्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
रवी राणांकडून उद्धव ठाकरेंचा निषेध नोंदवत पोलीस ठाण्यात १०१ वेळा हनुमान चालीसा पठण