खळबळजनक… मुलगा होत नसल्याने पतीने पत्नीसह तीन मुलींना दीड वर्ष घरातच ठेवलेलं डांबून

मुंबई तक

पंढरपूर: मुलगा होत नसल्याच्या कारणाने स्वतःच्या पत्नीसह तीन मुलींना घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डांबून ठेवलेल्या पीडित विवाहित महिलेसह दोन मुलींची निर्भया पथकाकडून तात्काळ सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी पतीच्या विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मुलगा होत नाही म्हणून आरोपी पतीने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंढरपूर: मुलगा होत नसल्याच्या कारणाने स्वतःच्या पत्नीसह तीन मुलींना घरात डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डांबून ठेवलेल्या पीडित विवाहित महिलेसह दोन मुलींची निर्भया पथकाकडून तात्काळ सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी पतीच्या विरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

मुलगा होत नाही म्हणून आरोपी पतीने पंढरपूर शहरातील झेंडे गल्लीतील एका घरात दीड वर्षापूर्वी पत्नीसह तीन मुलींना डांबून ठेवल्याचं आता समोर आलं आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आपल्या जबाबात असं म्हटलं आहे की, ‘पतीने माझा आणि माझ्या मुलींचा प्रचंड शारिरीक व मानसिक छळ केला.’ असा धक्कादायक जबाब महिलेने पोलिसांनाही दिला आहे.

या घटनेची निर्भया पथकाला माहिती मिळाली असता उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने कारवाई करत पीडित महिलेसह तिच्या तीन मुलीची सुटका केली आहे.

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, किचनमध्ये पुरला मृतदेह; मुलीच्या जबाबामुळे उघडकीस आला गुन्हा

हे वाचलं का?

    follow whatsapp