UPSC Civil Services Final Result 2021: नागरी सेवा परीक्षेत मुलींचाच डंका, अंतिम निकाल जाहीर
UPSC Civil Services Final Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने सोमवारी नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालात श्रुती शर्मा ही अव्वल ठरली आहे. यूपीएससीच्या निकालात मुलींचा वरचष्मा आहे. पहिल्या क्रमांकावर श्रुती शर्मा तर अंकिता अग्रवाल दुसऱ्या […]
ADVERTISEMENT
UPSC Civil Services Final Result 2021: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने सोमवारी नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचा निकाल पाहू शकतात. यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालात श्रुती शर्मा ही अव्वल ठरली आहे.
यूपीएससीच्या निकालात मुलींचा वरचष्मा आहे. पहिल्या क्रमांकावर श्रुती शर्मा तर अंकिता अग्रवाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर गामिनी सिंगला हिला तिसरा क्रमांक मिळाला आहे. तर चौथा क्रमांक ऐश्वर्या वर्मा हिने पटकावला आहे. उत्कर्ष द्विवेदी याला पाचवा क्रमांक मिळाला आहे. यक्ष चौधरी सहाव्या क्रमांकावर आहे. तर आठवा क्रमांक इशिता राठी, नववा क्रमांक प्रीतम कुमार आणि दहावा क्रमांक हरकिरत सिंग रंधावाला यांनी पटकावला आहे.
दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षा देतात, त्यापैकी काही मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. आयोगाने 5 एप्रिल ते 26 मे दरम्यान मुलाखती घेतल्या होत्या. ज्यानंतर आता त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
UPSC CIVIL SERVICES FINAL RESULT 2021 असा पाहता येईल:
-
सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
ADVERTISEMENT
आता तुम्हाला होम पेजवर UPSC नागरी सेवा निकाल 2021 – अंतिम निकालाची लिंक दिसेल.
ADVERTISEMENT
येथे तुम्हाला निवडलेल्या उमेदवारांच्या नावांसह एक PDF फाइल दिसेल.
आता तुम्ही तुमचा निकाल तपासू शकता आणि संदर्भासाठी प्रिंट आउट घेऊ शकता.
UPSC मुलाखतीत महाराष्ट्रातल्या वारली पेंटिंग साडीबाबतचा प्रश्न, अपालाने मिळवले जबरा मार्क्स!
UPSC द्वारे नियुक्तीसाठी एकूण 685 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये 244 सामान्य, 73 EWS, 203 OBC, 105 SC आणि 60 ST प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. UPSC द्वारे नागरी सेवा परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. ज्यामध्ये पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांनंतर निकाल जाहीर केला जातो. जे निकालात यशस्वी होतात ते IAS, IFS इत्यादी अधिकारी पदावर रुजू होतात.
ADVERTISEMENT