जाणून घ्या पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेली Vehicle Scrappage Policy आहे तरी काय?

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज Gujrat Investor Summit कार्यक्रमात बोलत असताना केंद्र सरकारची Vehicle Scrappage Policy जाहीर केली आहे. सध्याच्या घडीला ज्या गाड्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहेत, त्या गाड्या या पॉलिसीच्या माध्यमातून निकाली लावल्या जाऊ शकतील असा विश्वास मोदींनी बोलताना व्यक्त केला. “Vehicle Scrappage Policy हा भारताच्या विकासातला एक मैलाचा दगड ठरणार आहे. या पॉलिसीच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज Gujrat Investor Summit कार्यक्रमात बोलत असताना केंद्र सरकारची Vehicle Scrappage Policy जाहीर केली आहे. सध्याच्या घडीला ज्या गाड्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहेत, त्या गाड्या या पॉलिसीच्या माध्यमातून निकाली लावल्या जाऊ शकतील असा विश्वास मोदींनी बोलताना व्यक्त केला.

“Vehicle Scrappage Policy हा भारताच्या विकासातला एक मैलाचा दगड ठरणार आहे. या पॉलिसीच्या माध्यमातून जुन्या आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या गाड्या सोप्या पद्धतीने बाद केल्या जातील. या प्रक्रीयेत सहभागी असलेल्या प्रत्येकाला फायदा होईल आणि पर्यावरणाची हानी होणार नाही हे आमचं उद्दीष्ट आहे”, अशी प्रतिक्रीया मोदींनी दिली.

काय आहे केंद्र सरकारची नवीन VEHICLE SCRAPPAGE POLICY ?

या पॉलिसीच्या नावाप्रमाणे जुन्या बिघाड झालेल्या आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या गाड्या बाद केल्या जातील. तुमच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन कालावधी संपला की ही पॉलिसी आपोआप लागू होईल. रजिस्ट्रेशन कालावधी संपला की तुमच्या गाडीची एक फिटनेस टेस्ट होईल. देशातल्या वाहन अधिनियम कायद्याप्रमाणे एका गाडीचं आयुष्य हे १५ वर्षांचं असतं तर खासगी वापरासाठीच्या गाडीचं आयुष्य हे दहा वर्षांचं असतं. या मर्यादेपेक्षा जास्त काळ जी वाहनं रस्त्यावर चालतात ती नवीन वाहनांच्या तुलनेत पर्यावरणासाठी धोकादायक मानली जातात. नवीन वाहनांच्या तुलनेत जुन्या गाड्यांना पेट्रोलही जास्त लागतं. केंद्र सरकारच्या नवीन पॉलिसीमुळे वाहनधारकाला आपलं वाहन बाद करुन त्यावर काही बोनस मिळवता येणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp