शत्रूला धडकी भरवणारी INS विक्रांत नौदलाच्या ताफ्यात, जाणून घ्या वैशिष्ट्यं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत नौदलाला सुपूर्द केली. कोचीन शिपयार्ड लिमिटेड कोची येथे सकाळी ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली. यासोबतच पीएम मोदी यांनी नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण केलं. आयएनएस विक्रांतची खास गोष्ट म्हणजे ही एक स्वदेशी युद्धनौका आहे. 2009 मध्ये बनवायला सुरुवात झाली. आता 13 वर्षांनंतर ते नौदलाकडे जाणार आहे.

4 आयफेल टॉवरच्या वजनाइतकं वापरण्यात आलं लोखंड आणि स्टील

आयएनएस विक्रांतचं वजन 45000 टन आहे. म्हणजेच ते तयार करण्यासाठी फ्रान्समधील आयफेल टॉवरच्या वजनापेक्षा चौपट जास्त लोखंड आणि स्टील वापरण्यात आले आहे. इतकेच नाही तर त्याची लांबी 262 मीटर आणि रुंदी 62 मीटर आहे. म्हणजेच ते दोन फुटबॉल फील्डच्या बरोबरीचे आहे. पहिल्या स्वदेशी युद्धनौकेत 76% स्वदेशी उपकरणे आहेत. 450 किमी पल्ला असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्रही त्यावर तैनात केले जाणार आहे.यात 2400 किमीचे केबल लागले आहे. जे कोच्ची ते दिल्लीपर्यंत पोहचू शकते.

30 विमाने एकाच वेळी वाहून नेता येईल

IAC विक्रांत (स्वदेशी विमानवाहू वाहक) 30 विमाने तैनात करू शकतात. याशिवाय MiG-29K हे फायटर जेट अँटी एअर, अँटी-सर्फेस आणि लँड अॅटॅकमध्येही भूमिका बजावू शकते. ते कामोव्ह 31 हेलिकॉप्टर देखील उडवू शकते. विक्रांतच्या नौदलात समावेश झाल्यामुळे, भारत आता अशा देशांच्या यादीत सामील झाला आहे ज्यांच्याकडे स्वदेशी विमानवाहू जहाजांची रचना आणि निर्मिती करण्याची क्षमता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विक्रांतकडे लाइट हेलिकॉप्टर (ALH) आणि लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) व्यतिरिक्त मिग-29 लढाऊ विमाने, कामोव्ह-31, MH-60R आणि मल्टी-रोल हेलिकॉप्टरसह 30 विमानांचा समावेश असलेली हवाई विंग चालविण्याची क्षमता आहे. शॉर्ट टेक-ऑफ बट, रेस्टेड लँडिंग यांसारखे नवीन पायलटिंग मोडही यात वापरण्यात आले आहेत.

इतका आहे INS विक्रांतचा वेग

IAC विक्रांतकडे 2,300 कंपार्टमेंट्ससह 14 डेक आहेत ज्यात सुमारे 1,500 जवान वाहून जाऊ शकतात आणि त्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी, त्याच्या स्वयंपाकघरात सुमारे 10,000 भाकरी बनवता येतात. या युद्धनौकेला 88 मेगावॅट क्षमतेच्या चार गॅस टर्बाइन बसवण्यात आले असून तिचा कमाल वेग 28 ​​(नॉट) नॉट्स इतका आहे. हे 20,000 कोटी खर्चून बांधले आहे.

ADVERTISEMENT

संरक्षण मंत्रालय आणि CSL यांच्यातील कराराच्या तीन टप्प्यांत संपूर्ण प्रकल्पाची प्रगती झाली आहे. ते मे 2007, डिसेंबर 2014 आणि ऑक्टोबर 2019 मध्ये पूर्ण झाले. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमावर भर देणाऱ्या “आत्मनिर्भर भारत” चे हे उत्तम उदाहरण आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT