Second Wave : भारतात एवढ्या झपाट्याने का पसरतो आहे कोरोना?

मुंबई तक

Corona चे रूग्ण देशभरात झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची दुसरी लाट भारतात आली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात हे प्रमाण बरचंसं कमी झालं होतं मात्र फेब्रुवारीचा मध्य, मार्च आणि एप्रिल महिन्यात हे प्रमाण चांगलंच वाढलं आहे. याबाबत CSIR चे DG शेखर मांडे यांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली. CSIR चे DG शेखर मांडे म्हणतात.. कोरोना वाढण्याची अनेक कारणं असू […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

Corona चे रूग्ण देशभरात झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाची दुसरी लाट भारतात आली आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात हे प्रमाण बरचंसं कमी झालं होतं मात्र फेब्रुवारीचा मध्य, मार्च आणि एप्रिल महिन्यात हे प्रमाण चांगलंच वाढलं आहे. याबाबत CSIR चे DG शेखर मांडे यांनी त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली.

CSIR चे DG शेखर मांडे म्हणतात..

कोरोना वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. सप्टेंबर 2020 या महिन्यानंतर पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. त्यावेळीही दसरा, दिवाळी हे सण साजरे झाले होते. त्यामुळे आत्ताच सण उत्सवांमुळेच कोरोना वाढतो आहे असं म्हणता येणार नाही. कोरोना देशभरात पसरण्याची अनेक कारणं आहेत.

1) लोकांचा निष्काळजीपणा : कोरोना रूग्णांचं प्रमाण कमी झालं आणि लॉकडाऊनचे निर्बंध शिथील होऊ लागले तसा लोकांमध्ये निष्काळजीपणा वाढू लागला. लोकांनी कोरोना प्रतिबंधाची जी काळजी कोरोनाच्या काळात घेतली होती तशी ती नंतर घेतली नाही. मास्क न घालणे, गर्दी करणे या गोष्टी केल्या त्यामुळे कोरोनाचा फैलाव झाला.

हे वाचलं का?