मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवला, साहित्य संमेलानाध्यक्ष भारत सासणे यांची खंत

मुंबई तक

९५ वं अखिल भारतीय संमेलन हे उद्गिर या ठिकाणी होतं आहे. शरद पवारांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी त्यांनी या मंचावर आपले विचार मांडले. तर दुसरीकडे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनीही आपले परखड विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मांडले. Sharad Pawar Speech : देशातील हिंसा, प्रोपागंडा आणि माध्यमे; शरद पवार यांचं संपूर्ण […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

९५ वं अखिल भारतीय संमेलन हे उद्गिर या ठिकाणी होतं आहे. शरद पवारांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी त्यांनी या मंचावर आपले विचार मांडले. तर दुसरीकडे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनीही आपले परखड विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मांडले.

Sharad Pawar Speech : देशातील हिंसा, प्रोपागंडा आणि माध्यमे; शरद पवार यांचं संपूर्ण भाषण

काय म्हणाले भारत सासणे?

“आजच्या मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेला आहे. काही वर्षांपूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेंच्या कवितांमधून, क्वचित तेंडुलकरांच्या नाटकांमधून आणि संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून तसंच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामधून दिसला होता. आता मात्र हा चेहरा धूसर होत चालला आहे, हरवतो आहे.”

हे वाचलं का?