मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण अत्यंत सुमार दर्जाचं-फडणवीस - Mumbai Tak - the speech made by chief minister uddhav thackeray is very mediocre says devendra fadnavis - MumbaiTAK
बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं भाषण अत्यंत सुमार दर्जाचं-फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उत्तरादाखल केलेलं भाषण अत्यंत सुमार होतं अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात असा काही कंटेटच नव्हता ज्यावर काही प्रतिक्रिया देता येईल. आज मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्यासाठी भ्रमनिरास हा शब्दही छोटा आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. पाहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? शिवसेना स्वातंत्र्य […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उत्तरादाखल केलेलं भाषण अत्यंत सुमार होतं अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात असा काही कंटेटच नव्हता ज्यावर काही प्रतिक्रिया देता येईल. आज मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं त्यासाठी भ्रमनिरास हा शब्दही छोटा आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पाहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शिवसेना स्वातंत्र्य लढ्यात नव्हती हे त्यांनी मान्य केलं हे एकप्रकारे बरं झालं. पण त्यांना हे माहित नसेल की संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य सेनानी होते. इतिहासाची माहिती नसताना राजकीय भाषण अगदी विनाकारण केलं. मुख्यमंत्र्यांचं भाषण हे निराश करणारं चौकातलं भाषण होतं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. एवढं सुमार भाषण यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही झालं नाही.

पाहा मुंबई तकचा खास व्हीडिओ

भाजपने जर मुख्यमंत्र्यांवर टीका केली, गैर कारभार दाखवला तर आम्ही महाराष्ट्र द्रोही कसा काय ठरतो? आमच्या बोलण्यामुळे नाही तर तुमच्या कृतीमुळे महाराष्ट्राची बदनामी होते आहे. राम मंदिरासाठी जर जनता पैसे देते आहे तर यांना एवढं वाईट का वाटतं आहे? खंडणी वसूल करणाऱ्यांना जनतेचं समर्पण काय कळणार असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

आपल्या भाषणात उत्तर देत असताना आपण महाराष्ट्र विधानसभेत बोलतो आहोत याचाच विसर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पडला. महाराष्ट्राच्या विषयांवर त्यांना बोलता येत नाही हेच मोठे अपयश आहे. आम्ही कोरोनाच्या भ्रष्टाचाराची जी प्रकरणं बाहेर काढली त्याबद्दल त्यांच्याकडे काहीही उत्तर नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

संभाजी नगर नाव करून दाखवावं

औरंगाबादचं नामकरण संभाजी नगर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करून दाखवावं. मुख्यमंत्री याबाबत घोषणा करतात मात्र ते नामांतर करणार नाहीत कारण त्यांना खुर्ची प्यारी आहे अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =

विस्मरणाचा असेल आजार तर एवढंच करा दुधामध्ये फक्त ‘ही’ चार पानं टाका Tadoba: सगळ्यांसमोर भिडले दोन वाघ, रक्तबंबाळ झाले अन्.. दररोज Squats करा; मिळतील ‘हे’ 7 अप्रतिम फायदे! फिरायचा प्लान करताय? मुंबईपासून काही अंतरावर असलेली ‘ही’ ठिकाणं करा Explore रम आणि ब्रँडीमध्ये ‘हा’ आहे फरक… ‘या’ 5 टेक्निक्सने Hip Fat झटपट करा दूर! Team India सोबत विमानात कोण होती ती ‘मिस्ट्री गर्ल’, पाहा PHOTO सनी देओल दिसला दारूच्या नशेत, व्हिडीओ व्हायरल… ‘Animal’ मध्ये रणबीरसोबत रोमान्स, अभिनेत्रीचा ग्लॅमरस-हॉट लुक पाहिला का? Top 10 बेस्ट केटो डाएट फॉलो करून करा Weight Loss Weight Loss: महिन्याभरातच कसं व्हायचं स्लिम-फिट? दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात? Archies: नातवाचा ग्रँड डेब्यू; धाकट्या भावासोबत पहिल्यांदाच दिसले अमिताभ बच्चन! गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा ‘या’ छोट्या टिप्स… डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये? तुमचं सौंदर्य चाळीशीतही राहील सुंदर अन् निरागस; फक्त ‘या’ 3 गोष्टी नेहमी करा फॉलो! Rashmika Mandanna टोन आणि फिट फिगरसाठी घेते ‘हे’ सीक्रेट डाएट! Weight Loss 6 Low-Calorie Dinner: रात्री जरा कमी जेवा, कारण… Daman: मुंबईपासून एकदम जवळ, Vacation साठी हटके लोकेशन ते ही अगदी स्वस्तात