Mumbai Tak /बातम्या / खड्ड्यात गेली आमदारकी ! पाणी प्रश्नावर आक्रमक झालेल्या राजू पाटील यांची उद्विग्न प्रतिक्रीया
बातम्या

खड्ड्यात गेली आमदारकी ! पाणी प्रश्नावर आक्रमक झालेल्या राजू पाटील यांची उद्विग्न प्रतिक्रीया

कल्याण ग्रामीण मतदारसंघात भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नावर आज मनसे आणि भाजप एकत्र आलेले पहायला मिळाला मिळाले. भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी KDMC प्रशासनावर विशाल मोर्चा काढला. परंतू या मोर्चाला आंदोलनकार्त्यांच्या मागण्या ऐकण्यासाठी आयुक्तांची अनुपस्थिती होती, ज्यावर राजू पाटील यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीत सध्या अनेक नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. परंतू मोर्चेकऱ्यांना घेऊन महापालिका मुख्यालयावर धडक मारणाऱ्या दोन्ही आमदारांची चर्चा करायला पालिकेचे आयुक्त आणि एकही मोठा अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे प्रशासन नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी गंभीर नसल्याचा आरोप दोन्ही आमदारांनी केला.

लोकांचा प्रश्न जर हे प्रशासन गांभीर्याने घेणार नसेल तर खड्ड्यात गेली ती कामगिरी. लोकांचे प्रश्न गांभीर्याने न घेणं या प्रशासनाला चांगलंच महागात पडेल. आपल्याला लाजा वाटायला हव्यात, प्रश्नाचं निराकारण झालं नाही तर मी स्वतः प्रशासकीय इमारतीला टाळं ठोकून बाहेर उभा राहीन, मग बघू कोण येतं अशा शब्दांत राजू पाटलांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

साधारणपणे ज्याठिकाणी एखाद्या गावात टँकर सुरू होतो तो भाग जिल्हाधिकारी दुष्काळग्रस्त घोषित करतात. सध्याच्या घडीला 27 गावांमध्येही 200 पेक्षा जास्त टँकरने पाणी पुरवठा होत असेल तर हा संपूर्ण भाग दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची मागणी आमदार रविंद चव्हाण यांनी यावेळी केली. दरम्यान मनसे आणि भाजपने एकत्रित काढलेल्या मोर्चाबाबत आमदार रविंद्र चव्हाण यांना विचारले असता लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही यापूर्वीही अनेकदा एकत्र आलो आहोत. लोकहितासाठी एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची कोणतीही हरकत नसून पूर्वीसुद्धा एकत्र होतो आणि आताही आम्ही एकत्र असल्याचे आमदार रविंद चव्हाण यांनी सांगितले.

27 गावांना केडीएमसी प्रशासनाने वाऱ्यावर सोडले असून या गावांमध्ये पाण्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. प्रशासकीय कार्यवाही आम्हाला शिकवू नका, नको तो शहाणपणा करायचं नाही. तुम्हाला माज आलाय, आम्हाला तुम्ही काय वेडे समजताय का ? पाणी पुरवठ्याबाबत धोरणात्मक निर्णय असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात काय अडचण आहे? असा संतप्त सवाल विचारत उपस्थित प्रशासनावर दोन्ही आमदारांनी प्रश्नांची सरबत्ती केली.

---------

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 3 =

राखी सावंत म्हणालेली, ‘सनी लिओनीने मुलांना बिघडवून टाकलं’ अनिल अंबानी जेव्हा मदतीसाठी निता अंबानींना म्हणाले होते, “Thank You भाभी” या घड्याळाच्या किंमतीचा तुम्ही विचारही करू शकत नाही! Chatbot ने असं काय सांगितलं की, तरुणाने थेट केली आत्महत्या?, AIचे खतरनाक रूप Sai Tamhankar Troll : ‘श्रीमंतांची उर्फी’ म्हणून सोशल मीडियावर सई झाली ट्रोल! IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण? दही खाण्याचे भरपूर चमत्कारी फायदे, यापैकी तुम्हाला किती माहितीये? ‘सनी लिओनी तू भारत सोडून जा’, राखी सावंतने काय केले होते आरोप? ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींचे परप्रांतीय जोडीदार! एका अभिनेत्यावरून तरूणींमध्ये तुफान राडा! केस ओढत लाथाबुक्या…Video व्हायरल ‘या’ 3 ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करते मलायका, सांगितलं खास गुपित इंदूरच्या मंदिरात राम नवमीलाच मृत्युचे तांडव! तो प्रसंग सांगताना माजिद फारुकींनी फोडला टाहो Bollywood : जेव्हा प्रियांका चोप्राला दिला होता स्तनांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला ईशा अंबानी आणि राधिकाचे क्यूट बॉन्डिंग, इव्हेंसाठी ननंद-भावजयने कॅरी केल्या सारख्या हॅण्डबॅग! जन्मताच ‘या’ चिमुकलीची जगभर झाली चर्चा , नेमकं विशेष काय? Anushka Sharma चा पतीसोबतचा ग्लॅमरस अंदाज! मँचिंग ब्रँडेड पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली? Bollywood: वय 50च्या पुढे पण आजही दिसतात पंचवीशीतल्या, पाहा कोण आहेत ‘या’ अभिनेत्री