महाराष्ट्रातली पर्यटनस्थळं पुन्हा सुरू होणार, ठाकरे सरकारने आणली नवी नियमावली

मुंबई तक

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता तिसरी लाट ओसरली आहे. राज्यातला कोरोना संसर्ग आता कमी झाला आहे. संसर्ग नियंत्रणात असल्याची माहिती टास्क फोर्सने दिली आहे. त्यामुळे राज्यातले निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आजपासून 1 फेब्रुवारी 2022 पासून सगळी पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता तिसरी लाट ओसरली आहे. राज्यातला कोरोना संसर्ग आता कमी झाला आहे. संसर्ग नियंत्रणात असल्याची माहिती टास्क फोर्सने दिली आहे. त्यामुळे राज्यातले निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आजपासून 1 फेब्रुवारी 2022 पासून सगळी पर्यटनस्थळं, राष्ट्रीय उद्यानं, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमावलीनुसार राष्ट्रीय उद्यानं, सफारी, सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम किंवा लग्न सोहळे यासाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीची संमती देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारांसाठीच्या 20 व्यक्तींची मर्यादा हटवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

काय आहे राज्य सरकारची नवी नियमावली?

हे वाचलं का?